मैत्री बस सेवा पुन्हा सुरू Image Credit source: टीव्ही 9 मराठी
बांगलादेशमध्ये बीएनपीचं सरकार स्थापन झालं आहे, तारिक रहमान यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेताच आता भारत आणि बांगलादेशमधील संबंध पुन्हा एकदा पूर्ववत होताना दिसत आहेत. शुक्रवारी बांगलादेशकडून व्हिसावरील निर्बंध उठवण्यात आले, भारतासाठी पुन्हा एकदा व्हिसा सुरू करण्याची घोषणा तेथील सरकारने केली होती. त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे भारत आणि बांगलादेशमधील मैत्री बस सेवा 24 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा सुरू होणार आहे. ही बस ढाका मार्गे भारतामधील अगरताळा आणि कोलकाता या दोन शहरांना जोडते. ही बस सेवा पुन्हा एकदा सुरू होणार असल्यानं दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. बांगलादेशमध्ये तारिक रहमान यांचं सरकार येताच या बस सेवेची घोषणा करण्यात आली आहे.
बांगलादेशमध्ये उठाव
मैत्री बस सेवेमुळे अगरताळामधील लोकांना पुन्हा एकदा रोड मार्गे कोलकाताला जाता येणार आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये मोठा उठाव झाला होता, शेख हसीना यांना त्यामुळे बांगलादेशच्या पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं.तेव्हापासून ही बस सेवा बंद होती. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूसचं काळजीवाहू सरकार आलं, याकाळात भारत आणि बांगलादेशमधील संबंध चांगलेच ताणले गेले होते, मात्र त्यानंतर आता बांगलादेशमध्ये तारिक रहमान यांचं सरकार येताच बांगलादेश भारत संबंध सुधारत असल्याचं दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आता पुन्हा एकदा मैत्री बस सेवा सुरू होणार आहे.
भारताचे पूर्वीपासूनच बांगलादेशसोबत चांगले संबंध आहेत, मात्र शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर मोहम्म युनूस सरकारच्या काळात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक गोष्टी बंद करण्यात आल्या होत्या, त्यामध्ये दोन्ही देशांनी व्हिसा सेवा बंद केली होती, तसेच ही बस सेवा देखील बंद करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा नव्याने ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




