BAN vs PAK : बांगलादेशकडून पाकिस्तानचा धुव्वा, सेमी फायनलमध्ये 54 धावांनी विजय

वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेत उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने राधा यादव हीच्या नेतृत्वात श्रीलंकेवर मात केली. भारताने यासह अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. तर उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने होते. त्यामुळे बांगलादेशचा पराभव झाला असता तर चाहत्यांना अंतिम सामन्यात साखळी फेरीनंतर पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याचा थरार पाहायला मिळाला असता. मात्र तसं झालं नाही. बांगलादेशने पाकिस्तानवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. बांगलादेशने या विजयासह अंतिम फेरीत धडक दिली. या सामन्याच्या निकालासह अंतिम फेरीचंही चित्र स्पष्ट झालं.

बांगलादेशला पाकिस्तानसमोर 6 च्या रन रेटनेही धावा करता आल्या नाहीत. पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 110 धावांपर्यंतच पोहचता आलं. त्यामुळे पाकिस्तान सहज 111 धावा करुन जिंकेल, असं चित्र होतं. मात्र बांगलादेशने कहर केला. पाकिस्तानला बांगलादेशने 16.4 ओव्हरमध्ये 56 रन्सवर गुंडाळलं. बांगलादेशने अशाप्रकारे हा सामना 54 धावांनी जिंकला.

पहिल्या डावात काय झालं?

पाकिस्तानने टॉस जिंकून बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं. बांगलादेशची कॅप्टन फातिमा खातून हीने सर्वाधिक धावा केल्या. कॅप्टनने केलेल्या नाबाद 40 धावांच्या जोरावर बांगलादेशला 110 धावांपर्यंत पोहचता आलं. पाकिस्तानसाठी कॅप्टन हाफसा खालिद हीने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर इतर चौघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

बांगलादेशसमोर पाकिस्तान ढेर

बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला विजयी धावांचा पाठलाग करताना 15 हा आकडाही गाठता आला नाही. शव्वाल झुल्फिकार हीने सर्वाधिक 14 धावा केल्या. हाफसा खालिदने 12 धावांचं योगदान दिलं.तर युसरा आमिर 11 धावा करुन आऊट झाली. दोघींना भोपळाही फोडता आला नाही. तर इतरांनी बांगलादेशसमोर गुडघे टेकले.

बांगलादेशची जबरदस्त कामगिरी

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेशच्या एकूण 6 खेळाडूंनी बॉलिंग केली. त्यापैकी शोरिफा खातून हीचा अपवाद वगळता इतर 5 गोलंदाजांनी विकेट घेण्यात यश मिळवलं. संदिजा मेघला सर्वाधिक विकेट्स मिळल्या. संजिदाने 3.4 ओव्हरमध्ये फक्त 1.60 च्या इकॉनमीने फक्त 6 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या. फातिमा खातून हीने दोघींना बाद केलं.तर फरीहा त्रिस्ना, फातेमा सोनिया आणि फरजाना एसमिन या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. आता आशिया कप ट्रॉफीसाठी रविवारी 22 फेब्रुवारीला भारत विरुद्ध बांगालदेश यांच्यात महामुकाबला होणार आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *