बोरिया मजुमदार यांचा कॉलम:टीमचा विश्वास खेळाडूच्या ‎कामगिरीस उंचावू शकतो‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यापूर्वी अभिषेक शर्मा‎कोणत्या भावनांमधून जात होता? अनेक अपयशांनंतर ‎त्याचा मूड कसा राहिला असेल? तो वाढत्या दबावाला ‎तो कसा हाताळत असेल? त्याने अंतिम सामना‎ कोणत्या दृष्टिकोनातून पाहिला असेल आणि त्याची ‎रणनीती काय होती? विश्वचषकापूर्वी त्याच्या हातून‎ काहीही चूक होणार नाही, असा खेळाडू वाटत होता.‎प्रत्येक वेळी तो प्रहार करताना चेंडू थेट स्टँडमध्ये जात‎ असे. सगळीकडे त्याची चर्चा होती. या स्पर्धेत ‎त्याच्याकडे भारताचा हुकूमी एक्का म्हणून पाहिले जात‎ होते.. पण त्याच्या खात्यात सलग तीन शून्य जोडले गेले‎तेव्हा दबाव जाणवणे स्वाभाविक होते. स्वतःवर शंका ‎‎निर्माण झाली असेल. हा काळ त्याच्यासाठी एक कठीण ‎‎परीक्षा असेल. पण खेळाचे स्वरूप असे आहे की ‎‎कोणालाही सहज मिळत नाही. या विश्वचषकाच्या ‎‎अनुभवामुळे अभिषेक एक चांगला खेळाडू आणि ‎‎मानसिकदृष्ट्या अधिक कणखर व्यक्ती बनेल.‎ विश्वचषकात दबाव असामान्य असतो. आणि‎ प्रत्येकाचे लक्ष तरुण खेळाडूसाठी तो आणखी जास्त ‎‎असतो. खेळाने सर्वोत्तम खेळाडूंचीही परीक्षा घेतली‎ आहे आणि तो पुढेही घेत राहील. अशा परिस्थितीत‎ अभिषेक शर्माने जमिनीवरील वास्तव समजून घेणे,‎ परिस्थितीशी हुशारीने तोंड देणे, दबाव हाताळणे आणि ‎त्याला स्वतः ला दडपून न टाकणे गरजेचे होते. हे सांगणे‎ सोपे आहे पण करणे तितकेच कठीण. आणि इथेच ‎गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापन भूमिका बजावत‎ आले. त्यांना अभिषेकला बाहेरील आवाजापासून आणि ‎सोशल मीडियाच्या गोंधळापासून वाचवावे लागले.‎जेणेकरून तो या सर्वांमध्ये अडकून न पडता वर्तमानात‎ राहू शकेल. भारताने देखील अभिषेकला पूर्ण पाठिंबा ‎दिला पाहिजे. कारण त्याच्याकडे निर्णायक कामगिरी‎ करण्याची क्षमता आहे. अंतिम सामन्यात नेमके तेच ‎घडले. अभिषेकने दक्षतेने सुरुवात केली. परंतु डावाच्या ‎तिसऱ्या षटकापासून त्याने आपले हात मोकळे ‎करण्यास सुरुवात केली. त्याने जोरदार फटकेबाजी‎ केली. विश्वचषक अंतिम सामन्यात त्याने फक्त 19‎चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि पॉवरप्लेमध्ये ‎भारताचा स्कोअर 75 धावांच्या पुढे नेला. त्याचक्षणी अर्धा सामना जिंकल्यात जमा होता. अभिषेकने दबावावर मात केली आणि जेव्हा ते सर्वात महत्त्वाचे ‎होते. त्याने भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी केली. मी माझ्या वाचकांना सचिन तेंडुलकरचे उदाहरण देऊ‎ इच्छितो. 2003 च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी‎ भारताने न्यूझीलंडचा दौरा केला व सचिनने तीन‎ सामन्यांमध्ये 0, 1 आणि 1 धावा केल्या. त्याची पत्नी‎ अंजली म्हणाली की त्याचे स्कोअर दिल्लीच्या एसटीडी‎ कोडसारखे आहेत. पण विश्वचषक जवळ येताच‎ आम्हाला एक पूर्ण वेगळा सचिन दिसला. त्याने दबाव ‎स्वतःवर येऊ दिला नाही. शक्य तितका कठोर सराव‎केला. तो नेहमी करतो तेच त्याने केले. अभिषेकला‎ अगदी तेच करायचे होते : सहजता ठेवायची होती आणि‎ खेळ कायम ठेवायचा होता. प्रत्येक खेळाडूच्या मनात‎स्वतःबद्दल शंका निर्माण होते आणि तो कदाचित थोडा‎वेळ काढून काही एकेरी धावा घेण्याचा विचार करत ‎असेल. निर्णय पूर्णपणे त्याचा होता. त्यामुळे त्याला‎ आराम मिळाला असता तर ते ठीक होते; अन्यथा त्याने त्याच शैलीत खेळत राहिले पाहिजे होते. न्यूझीलंडने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अभिषेकविरुद्ध ऑफ-स्पिन रणनीती वापरली. त्यांनी‎ ग्लेन फिलिप्सपासून सुरुवात केली. त्यांना वाटले की ते‎त्याला अशा प्रकारे रोखू शकतील. पाकिस्तानने सलमान‎अली आगासह त्याला बाद केले होते आणि‎नेदरलँड्सनेही पहिल्या षटकात आर्यन दत्तसह यश‎मिळवले होते. पण यावेळी अभिषेक तयार होता. त्याने‎संयम दाखवला व संधीची वाट पाहिली. आक्रमण सुरू‎करण्यापूर्वी त्याने खेळाच्या परिस्थितीचे मूल्यांकन‎केले. सत्य हे आहे की खेळाडूंना पाठिंबा गरजेचा‎असतो. प्रतिभावान खेळाडू लवकरच किंवा नंतर‎चांगली कामगिरी करतील. परंतु यासाठी संयम आणि‎त्यांच्यावर अनावश्यक दबाव न आणला जाऊ नये.‎सोशल मीडियावरील चर्चेपासून त्यांचे संरक्षण करणे‎देखील महत्त्वाचे आहे.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)‎ खेळाडूंना पाठिंबा हवा असतो.‎प्रतिभावान खेळाडू कधी ना कधी तरी‎ चांगली कामगिरी करतात. पण यासाठी ‎संयम, अनावश्यक दबाव टाळणे‎ आवश्यक आहे. सोशल मीडियापासून‎ त्यांचे संरक्षण करणेही महत्त्वाचे आहे.‎


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *