नारायणगाव - लाल झालेली टोमॅटो खरेदी करण्यास व्यापाऱ्यांनी टाळाटाळ केल्यामुळे जुन्नर, पारनेर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली टोमॅटो आज दुपारी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबजारात टाकून निषेध केला. यामुळे उपबजार आवारात टोमॅटोचा लाल सडा पडला होता. काही वेळ व्यापारी व शेतकरी यांच्यात तणाव निर्माण झाला होता. बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर खंडागळे, प्रियांका शेळके, सचिव रुपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे यांच्या मध्यस्थी नंतर टोमॅटो लिलाव पुन्हा सुरू झाले.
तापमानात वाढ झाल्याने टोमॅटो लाल व खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.मागील पंधरा दिवसां पासून टोमॅटोची आवक वाढली असून भाव मातीमोल झाले आहेत. यामुळे टोमॅटो उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे.
टोमॅटो खरेदी नंतर चार ते पाच तासात टोमॅटो फळातून पाणी सुटत असल्याने तोटा टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी लाल टोमॅटो खरेदी बंद केली आहे. येथील उपबजारात आज सुमारे तीस हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली होती. सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत व्यापाऱ्यांनी चांगल्या गजरा टोमॅटो प्रतवारी नुसार ५० रुपये ते १०० रुपये भाव देऊन खरेदी केली. लाल टोमॅटोची खरेदी करण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांची मनधरणी करत होते.
मात्र टोमॅटोची खरेदी व्यापाऱ्यांनी बंद केली. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सुमारे तीनशे क्रेट लाल टोमॅटो उपबजार आवारात टाकून निषेध केला. या मुळे उपबजार आवारात वातावरण तप्त झाले. या बाबतची माहिती समजल्या नंतर बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष खैरे, माजी सरपंच योगेश पाटे, संचालक ज्ञानेश्वर खंडागळे, प्रियांका शेळके, माजी संचालक विपुल फुलसुंदर, प्रसन्ना डोके, बाबा परदेशी, बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे उपबजार आवारात दाखल झाले. त्यांनी शेतकरी प्रतिनिधी व व्यापारी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. या वेळी टोमॅटो टाकून देण्यावरून संचालक खंडागळे, पाटे व शेतकरी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. उपसचिव शरद घोंगडे यांनी शिल्लक टोमॅटो खरेदी करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. त्यानंतर दुपारी तीन नंतर टोमॅटोचे लिलाव पुन्हा सुरळीत सुरू झाले.
गोविंद काशीद शेतकरी (शेतकरी पोखरी कण्हेर, ता. पारनेर), अनिल ढोले (शेतकरी येणेरे, ता. जुन्नर) - एकरी एक लाख रुपये खर्च करून ऐन उन्हाळ्यात घाम गाळून टोमॅटोचे उत्पादन घेतले आहे. तापमान वाढल्यामुळे टोमॅटो लाल होण्याचे प्रमाण वाढल्याने एक तोड्याला एकरी १०० क्रेट उत्पादन निघत आहे. तोडणी, मजुरी वाहतूक भाडे या साठी प्रति क्रेट सत्तर रुपये खर्च झाला आहे. उपबजारात आल्या नंतर टोमॅटो खरेदी करण्यास व्यापारी टाळाटाळ करत आहेत. यामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
दत्ता शिंगोटे, योगेश घोलप (टोमॅटो व्यापारी) - राज्यातील टोमॅटोची मुख्य बाजारपेठ असलेल्या नाशिक बाजार समितीत सुद्धा चार दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी उपबजार आवारात टोमॅटो क्रेट टाकून दिले आहेत. आवक वाढल्याने व मागणी नसल्यामुळे राज्यात टोमॅटोचे भाव कोसळले आहेत. तापमान वाढीमुळे फळावर तिरंगा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, लाल टोमॅटो खरेदी नंतर चार ते पाच तासात टोमॅटो फळातून पाणी सुटत आहे. मागील आठ दिवसात व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. कर्ज काढून शेतकऱ्यांचे पैसे द्यावे लागले आहेत. व्यापाऱ्याची बाजू कोणी समजून घेत नाही.
शरद घोंगडे (उपसचिव बाजार समिती) - टोमॅटोची आवक वाढली आहे.तापमान वाढीमुळे लाल टोमॅटो इतर राज्यात विक्रीसाठी पाठविल्यास खराब होतात. राज्यातील सर्व भागात टोमॅटोचे भाव मातीमोल झाले आहेत. आज सकाळी लिलाव सुरळीत सुरू होते. मात्र काही शेतकऱ्यांनी टोमॅटो आवारात टाकून दिल्याने तणाव वाढला. बाजार सुरू राहण्यासाठी व्यापारी व शेतकरी हे दोन्ही घटक महत्वाचे आहेत.
शहर
- Pune : कुठे आहेत ‘स्मार्ट’ प्रकल्प? स्मार्ट सिटी योजनेवर स्वयंसेवी संस्था आणि विरोधकांकडून प्रश्न
- Pune : सर्वांत महाग घरे लॉ कॉलेज रस्त्यावर, प्रतिचौरस फुटांसाठी १६ हजार ८१६ रुपये दर, कोरेगाव पार्कपेक्षा अधिक
- Mumbai : इगतपुरी-आमणे समृद्धी महामार्ग : लोकार्पणाआधीच महामार्गावरून अनधिकृतपणे वाहने धावू लागली
- Mumbai : मुंबईकरांवर कचरा शुल्काचा बोजा; १०० रुपये ते ७५०० रुपये आकारणार
महाराष्ट्र
- Ulhasnagar : खिडकीत बसलेली दोन मुले दुसऱ्या मजल्यावरून कोसळली; ग्रील तुटल्याने घडली घटना
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Kathua Encounter: जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, 'जैश'च्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ४ जवान शहीद
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”