Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं महाराष्ट्र हादरला अन् बीडमधील कायदा सुवस्थेची चर्चा सुरू झाली. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली. तर वाल्मीक कराड यानं सरेंडर केले. वाल्मीक कराड याच्यावर खंडणीचा आरोप आहे. वाल्मीक कराड यानं सरेंडर केलं, पण तीन फरार आरोपींचं काय? असा सवाल बीडमध्ये उपस्थित होत आहे. मस्साजोग गावकऱ्यांकडून आक्रमक आंदोलन करण्यात येत आहे. फरार आरोपींना अटक करा, या मागणीसाठी मस्साजोगच्या गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. वाल्मीक कराड यानं सरेंडर केले, पण सीआयडी तीन फरार आरोपींना पकडणार का? याची चर्चा सुरू आहे.
सीआयडीकडून तपास सुरूच -
९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर बीडमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. जनतेचा रोष पाहाता हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले. वाल्मीक कराड यानं सीआयडीलाही काही दिवस चकमा दिला. त्यानं मंगळवारी पुण्यात सरेंडर केले. आता सीआयडीकडून तीन फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.
मुख्य आरोपी फरारच, अटक कधी?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे जण फरार आहेत. सीआयडीचा फोकस आता सुदर्शन घुले याच्यावर आहे. सुदर्शन घुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपीच्या CID मुसक्या आवळणार का? असा सवाल उपस्थित होतोय. सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय व्यक्त होतोय.
|
कुटुंबियांची चौकशी
वाल्मीक कराडच्या नंतर तपास यंत्रणांचा फोकस तीन फरार आरोपीवर आहे. सुदर्शन घुले याच्या घरच्यांची आणि नातेवाईकांशी कसून चौकशी करण्यात येत आहे. फरार तिन्ही आरोपीच्या नातेवकांची सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकाशी झाल्याची सूत्रांनी सांगितले. नातेवाईकांच्या संपर्कात हे तिन्ही आरोपी आहेत का? याचा ही तपास सीआयडी कडून होत असल्याची माहिती मिळाली. सीआयडीकडून तिन्ही आरोपींच्या शोधासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत.मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार ३ आरोपींना तात्काळ अटक करा, ही प्रमुख मागणी घेऊन बीडच्या मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गावकऱ्यांनी परिसरातील पाझर तलावात जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता 22 दिवस उलटले, मात्र अद्यापही तीन आरोपी फरार आहेत. यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे तात्काळ या फरार आरोपींना अटक करावं, ही प्रमुख मागणी घेऊन जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे.
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील चार आरोपींना बीड शहर पोलीस ठाण्यातून इतर ठिकाणी हलवले
खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक याला बीड शहर पोलीस ठाण्याच्या लोकांना आणण्यात आले पोलीस कस्टडीमधील बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये आहेत यामुळे पोलिसांनी मोठे पावलं उचलत आरोपी विष्णू चाटे जयराम चाटे प्रतीक घुले आणि केदार यांना या आरोपींना आता दुसऱ्या लॉकप मध्ये हलवण्यात आले आहे गेवराईच्या लोकांमध्ये त्यांना हरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाल्मीक कराड याला ज्या लोकांमध्ये ठेवला आहे. त्या लॉकअप मध्ये असलेले इतर चार आरोपी दुसऱ्या पोलीस ठाण्यातील लॉकअपकडे पाठवले आहेत. बीड शहर पोलीस ठाण्याच्या लोकांमध्ये यापूर्वी चार आरोपी ठेवण्यात आले होते. त्यामध्ये विष्णू चाटे हा खून आणि खंडणीच्या पुण्यातील आरोपी आहे. त्यासोबत तीन आरोपीही खुन आणि इतर गुन्ह्यातील आहेत.
शहर
- Pimpri : महापालिकेच्या दोन अतिरिक्त आयुक्तांसह ३४ अधिकाऱ्यांना नोटीसा; वाचा नेमके काय आहे प्रकरण?
- Pune : कल्याणीनगर अपघात प्रकरणाची सुनावणी लवकरच सुरू
- Pune : पुरंदर विमानतळ परिसरातील जमीन खरेदी-विक्री व्यवहार बंद!
- Mumbai : कामा रुग्णालयात अतिविशेषोपचार युरोगायनॅक अभ्यासक्रम ऑगस्टपर्यंत सुरू होण्याची शक्यता
महाराष्ट्र
- Nagpur : नागपूरमध्ये कसा सुरू झाला हिंसाचार? मुख्यमंत्र्यांनी सांगितला घटनाक्रम, म्हणाले, “पोलीस उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला”
- Nagpur Violence : नागपूरमध्ये सध्या कशी आहे परिस्थिती? पोलीस आयुक्त म्हणाले, “हिंसाचार करणाऱ्यांची…”
- DCM Eknath Shinde : “नागपुरातील घटना पूर्वनियोजित कट?”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संशय, म्हणाले, “या भागात रोज…”
- Pune : कल्याणीनगर अपघात प्रकरणाची सुनावणी लवकरच सुरू
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Kedarnath : केदारनाथ, हेमकुंड साहिबला ‘रोप-वे’
- Cape Canaveral : खासगी यानाचे चंद्रावर पाऊल; नासाच्या सहकार्याने ‘फायरफ्लाय एअरोस्पेस’ची मोहीम
- IIT Baba News : भर कार्यक्रमात IIT बाबाला काठीनं झोडलं, पोलिसांनी नोंदवली नाही कंप्लेंट; लाईव्ह येत म्हणाला..
- Weather Update : चक्रीवादळ वाऱ्यांमुळे वातावरणात मोठा बदल; 'या' राज्यात होणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याने वर्तवला अंदाज