Raghuveer Ghat News : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटातील (Raghuveer Ghat Bad Road Condition) रस्ता आजही धोकादायक स्थितीत आहे. यामुळे आगामी काळात नैसर्गिक संकट आल्यास सातारा जिल्ह्यातील 40 गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चार वर्षांपासून रस्त्यावर कोसळलेली दरड अजूनही तशीच आहे. या भागाकडे लक्ष द्यावे अशी साद शिंदी विभागातील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
कोयना अभयारण्यात शिवसागर जलाशय शेजारी वसलेल्या सातारा जिल्ह्यातील 40 हुन अधिक गावांचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याशी असणारा संपर्क यावर्षी पूर्णतःच ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला घाटातील खचलेला अरुंद रस्ता यामुळे शिंदी विभागातील जनतेला आपला जीव मुठीत घेऊनच सध्या या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे.
सर्व भौतिक सुविधांसाठी रत्नागिरी जिल्ह्यावर अवलंबून असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील 40 गावांमधील जनतेच्या समस्येकडे प्रशासनाने मात्र साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच या विभागातील ग्रामस्थांनी आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साद घातली आहे.
सह्याद्री पर्वतरांगेत असलेला रघुवीर घाट हा पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्याच बरोबर सातारा जिल्ह्यातील संरक्षित व्याघ्र प्रकल्प व कोयना अभयारण्यात जाण्यासाठी देखील रघुवीर घाटातील रस्ता हा प्रमुख मार्ग आहे. कोयना अभयारण्यात शिवसागर जलाशय शेजारी सातारा जिल्ह्यातील 40 हुन अधिक गावे वसलेली आहेत. ही गावे सातारा जिल्ह्यात जरी असली तरी सर्व भौतिक सुविधांसाठी या गावातील ग्रामस्थाना रत्नागिरी जिल्ह्यावर अवलंबून राहावे लागते.
मुलांचे शिक्षण असो की आरोग्याच्या सोयी-सुविधा असो या सर्वांसाठी येथील जनतेला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याशी संपर्क ठेवावा लागतो. पण दरवर्षी पावसाळ्यात याच रघुवीर घाटात भल्यामोठ्या दरडी कोसळत असल्याने हा रस्ता प्रशासनाकडून बंद ठेवला जातो.
पावसाळ्यात तात्पुरती दरड हटवल्यानंतर मात्र याकडे पुन्हा प्रशासकीय यंत्रणा ढुंकून देखील पहात नाही. त्यामुळेच गेल्या चार वर्षांपूर्वी कोसळलेली दरड आजही रस्त्याच्या बाजूला त्याच ठिकाणी असल्याचे दुर्दैवी चित्र याठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूला खोल दरी आणि खचलेला अरुंद रस्ता यावरूनच येथील ग्रामस्थाना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
या विभागातील अनेक विद्यार्थी हे शाळेसाठी खेड तालुक्यातील खोपी गावात एसटीने येतात. पण उद्या पावसाळ्यात जर हा रस्ताच ठप्प झाला तर विद्यार्थ्यांना मात्र शिक्षणापासून वंचित राहावे लागण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी व सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा मार्ग राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूळगावी म्हणजेच दरे या गावी जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून वापरला जातो. कोयना जलशयशेजारी असणाऱ्या 40 गावातील लोकांना महसुली कामकाजासाठी महाबळेश्वर येथे जावे लागते. परंतु पावसाळ्यात येथील ग्रामस्थांना महाबळेश्वर येथे जाण्यासाठी खेडला येऊन वळसा मारून जावे लागते. पावसाळ्यात जेंव्हा या मार्गावर दरड कोसळते तेंव्हा शासकीय यंत्रणेकडून पावसाळ्यानंतर या रस्त्याचे काम हातात घेतले जाईल असे आश्वासन दिले जाते.
प्रत्यक्षात आता अवघ्या दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपलेला असतानाही या घाटात अद्याप कोणतेही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात रघुवीर घाटातील हा रस्ता पूर्णतः ठप्प होण्याची भीती येथील ग्रामस्थांना सतावत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक लक्ष घालून आमची समस्या सोडवावी अशी मागणी सातारा जिल्ह्यातील 40 गावांमधील ग्रामस्थांनी केली आहे.
शहर
महाराष्ट्र
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
- Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून 'या' भागात गारपीटचा येलो अलर्ट, अवकाळीचे ढग कायम
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं