
Raj thackeray : राज्यात हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने मराठी भाषा विजय दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्ताने २० वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले आहेत. या मराठी विजय सोहळ्यामध्ये भाषण करताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी आणि महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. 'आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको. महाराष्ट्राला आणि मुंबईला हात लावूनच दाखवा.', अशा शब्दात राज ठाकरे यांनी थेट मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारला इशारा दिला.
राज ठाकरे यांनी सांगितले की, 'खरं तर आज मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचे एक चित्र मोठ्या प्रमाणात उभं राहिले असतं. पण फक्त मोर्चाच्या चर्चेने माघार घ्यावी लागली. आजचा मेळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं पण पाऊस असल्यामुळे जागा मिळत नाही. मी माझ्या मुलाखतीत सांगितले होते की कोणत्याही वादापेक्षा कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास २० वर्षांनंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावर येत आहोत.'
जे माननिय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं, असं म्हणत राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावला. 'मोर्चाला मी हिच घोषणा होती की कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा आहे. माझ्या मराठीकडे आणि महाराष्ट्राकडे वेड्या वाकड्या नजरेने पाहायचे नाही. खरं तर हा प्रश्न यायला नव्हता पाहिजे होता. पण कुठून हिंदीचा विषय आला माहिती नाही. पण कशासाठी हिंदी, कुणासाठी हिंदी लहान मुलांवर जबरदस्ती करत आहेत. कुणाला विचारायचे नाही शिक्षण तज्ज्ञांना विचारायचे नाही. पण आमच्याकडे सत्ता आहे बहुमत आहे आम्ही लादणार असे त्यांना वाटते. तुमच्याकडे सत्ता असेल तर विधानभवनात आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर.', अशा शब्दात राज ठाकरे यांनी सरकारला थेट इशारा दिला.
|
|
राज ठाकरे यांनी पुढे सांगितले की, 'हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा पुढे करून यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते हा त्यासाठी आगोदर भाषेला डिवचून पाहिले. कुणाची माय व्यायली आहे त्यांनी महाराष्ट्रात आणि मुंबईत हात घालून दाखवावा. काय मस्करी वाटली का?. आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. काही अंगावर लादायचा प्रयत्न करू नका. मग वेगळीकडे वळवा प्रकरण. मग काय ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडिअममध्ये शिकले. दादा भुसे मराठी शाळेत शिकून शिक्षणमंत्री झाले. देंवेंद्र फडणवीस इंग्रजीत शिकून मुख्यमंत्री झाले. अरे कुणाकुणाली मुलं परदेशात शिकतात याची यादी आहे आमच्याकडे. मंत्रिमंडळातील मंत्र्याची हिंदी ऐकाल तर फेफरे येईल.'
हिंदी भाषा सक्तीनंतर राज ठाकरे यांनी सरकारला काही पत्र पाठवले होते. त्याबद्दल सांगताना ते म्हणाले की, 'एक पत्र लिहिले, दोन पत्र लिहिले नंतर ते दादा भुसे आमच्याकडे आले. ते म्हणाले आम्ही बोलतो ते समजून घ्या. पण मी त्यांना सांगितले मी ऐकून घेईल पण ऐकणार नाही. त्रिभाषा सूत्र कुठून आणले. ते सूत्र आले ते केंद्राकडून. केंद्र सरकार आणि राज्य सरकरामधील दुव्यासाठी हे त्रिभाषा सूत्र आणले होते. केंद्रीय शिक्षण धोरणातही असं काही नाही. इतर राज्यातही असं काही नाही. त्यांनी महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला. दक्षिणकडची राज्यांत बघा. महाराष्ट्र जेव्हा पेटून उठतो तेव्हा काय होते हे राज्यकर्त्यांना कळाले. त्याशिवाय त्यांनी माघार नाही घेतली.'
शहर
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
महाराष्ट्र
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
गुन्हा
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

