Nagpur News : भगर आणि शिंगाड्याचे पीठ खाल्ल्यामुळे ५० हून अधिक नागरिकांना विषबाधा, नागपूरमधील धक्कादायक प्रकार

Nagpur News : महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी उपवासाच्या पदार्थांमधून विषबाधा झाल्याने अनेकजण रुग्णालयात दाखल झाले आहेत. नागपूर  जिल्ह्यातील कामठी  येथे ५० हून अधिक लोकांना विषबाधा झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Accident News : साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक; एक ठार, तीन गंभीर जखमी

महाशिवरात्रीनिमित्त अनेकजणांनी भगर आणि शिंगाड्याच्या पिठाची शेव आणि भजी खाल्ली होती. त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. मेयो रुग्णालयात 34 रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. शहरातील इतर अनेक भागात  सुद्धा काही लोकांना विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत शिंगाड्याच्या पिठाचे नमुने घेण्याचे काम सुरू होतं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply