मुंबई - मुंबईला पाणी पुरविणा-या सात तलावांपैकी तुळशी, विहार, तानसानंतर आज मोडकसागर हा चौथा तलावही भरून वाहू लागला आहे. त्यामुळे सातही तलावांत सध्या ६८.६ टक्के पाणीसाठा जमा झाला असून तो एप्रिल २०२४ पर्यंत पुरेल इतका जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे येत्या ऑगस्टमध्ये पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय पालिकेकडून होण्याची शक्यता आहे.
मान्सून लांबल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणा-या तलावांनी तळ गाठला होता. पालिकेला १० टक्के पाणी कपात करावे लागले आहे. सध्या तलावक्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू आहे. त्यामुळे सात तलावांपैकी तुळशी, विहार, तानसानंतर आज मोडकसागर हा चौथा तलावही भरून वाहू लागला आहे.
त्यामुळे सातही तलावांत सध्या ६८.६ टक्के पाणीसाठा जमा झाला असून तो एप्रिल २०२४ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे येत्या ऑगस्टमध्ये पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय पालिकेकडून घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
तुळशी, विहार, तानसानंतर आता मोडकसागर ही चार तलावे आठ दिवसांत भरून वाहू लागली आहेत. धऱण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असल्याने सातही तलावांत पाणीसाठा वाढत आहे. मोडक सागर रात्री १०.५२ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण ही १२,८९२.५ कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर) इतकी आहे, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. सातही तलावांमध्ये ९८,५१३ कोटी लीटर (९,८५,१३० दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ६८.०६ टक्के एवढा पाणीसाठा आहे. सात धरणांपैकी चार तलाव हे गेल्या आठ दिवसांत ओव्हर फ्लो झाल्याने २५५ दिवसांचा पाणीसाठा जमा झाला आहे.
हा पाणीसाठा एप्रिलपर्यंत पुरेल इतका असल्याने मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याचे टेन्शन दूर झाले आहे. धरणांतील पाणी साठ्याची उपलब्धता लक्षात घेऊन १ जुलैपासून मुंबईत लागू असलेली १० टक्के पाणी कपात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रद्द करण्याचा निर्णय घेतला घेतला जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिली.
सात धरणांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. २८ जुलै २०२३ रोजी सातही धरणात ९ लाख ८५ हजार १३० दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
|
सात धरणांतील पाणीसाठा ( दशलक्ष लिटरमध्ये)
अप्पर वैतरणा - ९७,१४१
मोडक सागर - १,२८,९२५
तानसा - १,४४,४७५
मध्य वैतरणा - १,५४,२४९
भातसा - ४,२४,५९६
विहार - २७,६९८
तुळशी - ८,०४६
तीन वर्षांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
२०२३ - ९,८५,१३०
२०२२ - १२,७६,११६
२०२१ - १०,१३,८७०
शहर
महाराष्ट्र
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
- Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून 'या' भागात गारपीटचा येलो अलर्ट, अवकाळीचे ढग कायम
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं