Mumbai Dam Water Level: आनंदवार्ता! मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं १०० टक्के भरली, वर्षभराचे पाणी टेन्शन मिटलं

Mumbai Dam  : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईकरांचे वर्षभराच्या पाण्याचे टेन्शन पूर्णपणे मिटलं आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं १०० टक्के भरली आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आणि धरणं ओव्हर फ्लो झाला. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. पण आता पुन्हा पावसाने जोर धरला आहे. सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे देखील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होऊन जलसाठा १०० टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा वर्षभरासाठीचा पाणीप्रश्न मिटला आहे. कोणत्या धरणांमध्ये सध्या किती टक्के पाणीसाठा आहे हे आपण जाणून घेणार आहोत...

मुंबई महानगर पालिकेने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा १०० टक्क्यांजवळ पोहचला आहे. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १४,३९,२७१ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ९९.४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये १४,३३,१४१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच मागच्यावर्षी ९९.०२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी सातही धरणातील पाणीसाठा जास्त झाला आहे.

Maharashtra Politics: 'चिंगम' राऊतांनी 'सिंघम' फडणवीसांची चिंता करू नये, भाजप नेता भडकला

 


मुंबई शहर आणि उपनगराला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये ५ धरण आणि २ तलावांचा समावेश आहे. या सातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या अडीच महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत गेली. या धरणातील पाणीसाठा ९९.४४ टक्क्यांवर पोहचला आहे. सध्या धरणक्षेत्रात परतीचा पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढत चालला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीपुरववठा केला जातो.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - ९९.७९ टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - १०० टक्के पाणीसाठा.

- तानसा - ९९.५८ टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - ९८.७९ टक्के पाणीसाठा

- भातसा - ९९.३५ टक्के पाणीसाठा.

- विहार - १०० टक्के पाणीसाठा.

- तुलसी - १०० टक्के पाणीसाठा



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply