पुणे : पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संभाव्य दरडप्रवण, भूस्खलन होणाऱ्या अतिसंवेदनशील गावांची प्रशासकीय पातळीवर तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार धोक्याच्या ठिकाणावरील स्थानिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येणार आहे. सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस होत राहिल्यास कमी धोका असणाऱ्या गावातील नागरिकांचे देखील तत्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाची दहा पथके सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात माळीण येथे झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत मदत व पुनर्वसन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संभाव्य धोका असणाऱ्या गावांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. तत्पूर्वी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) या विभागामार्फत स्थानिक पातळीवर सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील २३ गावांना पावसाळय़ामध्ये धोका निर्माण होईल अशी शक्यता सर्वेक्षणाअंती व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गेल्या आठवडय़ात आपत्ती व्यवस्थापन आराखडय़ासंदर्भात बैठक घेतली. त्यामध्ये संभाव्य धोका असणाऱ्या गावांमधील सुरक्षिततेसंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाला आदेश दिले आहेत. हवामान विभागाने यंदाही सरासरीपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांतील पाऊस पाहता प्रथम आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दहा तुकडय़ा तैनात करण्यात येणार आहेत. तालुकानिहाय एका तुकडीत ५०० प्रशिक्षित अधिकारी, जवान, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, अतिवृष्टी झाल्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा गावांची पाहणी करून त्या गावात ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील यांना संबंधित गावांमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सलग तीन दिवस संततधार पाऊस झाल्यास तत्काळ स्थानिकांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या आहेत.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अहवालानुसार जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या सात तालुक्यांमधील धोकादायक गावांमध्ये स्वतंत्र तुकडय़ा तैनात करण्यात येणार आहेत. या तुकडय़ांना वेळोवेळी माहिती देण्यासाठी संपर्क कक्ष स्थापन करम्ण्यात आला असून तुकडय़ांमधील संपर्क प्रमुखाने २४ तास संपर्कात रहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तुकडय़ा तैनात करम्ण्यात आल्या असून प्रशासनातील सर्व विभागांना सूचना करण्यात आल्या असल्या, तरी स्थानिक पातळीवरील माहिती प्रशासनापर्यंत पोचण्यासाठी किंवा प्रशासकीय व्यक्ती घटनास्थळी पोचण्यापर्यंत कालावधी लागत असल्यामुळे आजूबाजूच्या गावांनी परस्पर संपर्कात रहावे. विशेषत: दरडप्रवण क्षेत्रालगत असणाऱ्या गावांनी आपत्ती काळात प्रशासनाला सहकार्य करावे. त्यांचे सहकार्य लाभल्यास शासकीय पातळीवर प्रश्न सोडवण्यास मदत होईल.
शहर
- Navi Mumbai : नवी मुंबईत आज पाणीबाणी, कोण कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद?
- Gaja Marne : गजा मारणेला जेलमध्ये नेताना मटण पार्टी, ढाब्यावर 'ते' ३ लोकंही उपस्थित
- Pune Crime : पत्रकार असल्याची बतावणी करत सलून मालकांना ब्लॅकमेल, पुण्यातील मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पिता-पुत्राचा कांड
- Pimpri Chinchwad : इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील बेकायदा २९ बंगले पाडण्यावर शिक्कामोर्तब; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
महाराष्ट्र
- Sakri News : अवकाळीने संसार उघड्यावर; पडलेले घर पाहून महिलेचे अश्रू अनावर
- Wardha : बांधकाम करताना विहीर खचली; मलब्याखाली दबून एकाचा मृत्यू, दोन मजूर जखमी
- Akola : कर्जमाफीसाठी वंचित शेतकरी उच्च न्यायालयात; आठ वर्षांपासून प्रतीक्षा
- Solapur Accident : अपघाती निधन झालेल्या वडिलांचा अंत्यविधी उरकला, परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं; भीषण अपघातात मुलाचा मृत्यू
गुन्हा
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा