Manipur Violence : मणिपूरमधील परिस्थिती चिघळली; हिंसक जमावाने केंद्रीय मंत्र्याचं घर पेटवलं,

Manipur Violence : मणिपूरमध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचार काही केल्या थांबताना दिसत नाही. संतप्त नागरिकांनी काल केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांचं घरच पेटवून दिलं आहे. या घटनेतून मणिपूरमधील नागरिकांच्या संतापाची कल्पना केली जाऊ शकते.

मणिपूरमधील इंफाळमध्ये काल 15 जून रात्री जमावाने केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांच्या घराला आग लावली. मिळालेल्या माहितीनुसार, सुदैवानी जमावाने घराला आग लावली त्यावेळी घरात कुणीही नव्हतं. केंद्रीय मत्र्यांच्या घराव्यतिरिक्त आणखी दोन घरेही हल्लेखोरांनी पेटवली.

महिला मंत्र्याचं घरंही पेटवलं

दोन दिवस आधी 14 जून रोजी काही हल्लेखोरांनी इंफाळच्या लामफेलमधील महिला मंत्री नेमचा किपजेन यांच्या अधिकृत घरालाही आग लावली होती. यावरुन मणिपूरमधील स्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात असल्याचं दिसून येत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply