Maharashtra Weather : हवामानात सतत चढ-उतार; मुंबईत हवेची गुणवत्ता घसरली, राज्यात पुढील दिवसांत कसं असेल वातावरण?

Mumbai : राज्यातील तापमानात, हवामानात सतत बदल, चढ-उतार होत आहेत. राज्यातील काही भागात हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे याचा परिणाम राज्यातही दिसू शकतो.

त्यामुळे महाराष्ट्रात काही भागात ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज आहे. मात्र मुंबईत आज आज आकाश निरभ्र असेल. शहरातील कमाल तापमान 28.1 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 24.4 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तसंच पावसाची कोणताही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.

Mumbai Mayor : ९-१० फेब्रुवारीला निवडणूक नको; ‘या’ कारणामुळे नगरसेवकांची मागणी, महापौर निवड दुसऱ्या आठवड्यात?

काल, गुरुवारी मुंबईतील हवेची गुणवत्ता 'खराब' श्रेणीत होती. AQI अर्थात हवेची गुणवत्ता 309 पर्यंत आला होता. या खराब हवेमुळे श्वसनासंबंधी त्रास होऊ शकतो. तसंच डोळे आणि घशात जळजळ होण्यासारखे त्रास जाणवू शकतात. मात्र आत कालच्या तुलनेत हवेची गुणवत्ता काही अंशी चांगली आहे. सायन आणि वडाळा यांसारख्या अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता 'धोकादायक' पातळीवर पोहोचली होती. इमारतीचं बांधकाम, वाहनांमधून निघणारा धूर, वाहनातील उत्सर्जनामुळे हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावते.

दरम्यान, मागील तीन ते चार दिवसांपासून जळगाव, नाशिक आणि राज्यातील इतर काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. जळगावात तर गारपिटीने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या भागात नुकसानाची तीव्रता अधिक असून उर्वरीत भागात तुलनेने कमी फटका बसला आहे. अवकाळी आणि गारपिटीने नुकसान झाल्यानंतर आता पंचनामे केले जात आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व बाधित क्षेत्रांचे प्राथमिक अहवाल सादर करण्यात आले आहेत, नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष पंचनामे सुरू आहेत. हे पंचनामे पूर्ण झाल्यावरच शेतीच्या नुकसानीचा शेवटचा आकडा समोर येईल.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “Maharashtra Weather : हवामानात सतत चढ-उतार; मुंबईत हवेची गुणवत्ता घसरली, राज्यात पुढील दिवसांत कसं असेल वातावरण?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *