Maharashtra Top News | राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरच भरणार? स्थानिक स्वराज्य निवडणुकांनंतर राजकीय हालचालींना वेग

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून विधानपरिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राज्यपाल कोट्यातून प्राधान्य दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांनी लॉबिंग सुरू केल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, संभाव्य उमेदवारांची चाचपणी सर्वच प्रमुख पक्षांकडून सुरू असून अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोट्यातील जागांबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवारांची भेट घेणार असून काही वेळातच महत्त्वाची बैठक सुरू होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विजयी उमेदवारांशी संवाद साधून पुढील रणनीती निश्चित करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष निवडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *