अहमदनगर जिल्ह्यात 41 हजार 141 क्विंटल कांद्याची आवक,3 हजार 100 रुपयांकडे आगेकूच! शेतकरी आनंदित


Maharashtra : अहमदनगर जिल्ह्यासह राज्यभरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. जूनच्या सुरूवातीलाच समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीसाठीची तयारी करत आहे. त्यातच गावरान कांद्याच्या भावात देखील वाढ झाली आहे.

शुक्रवारी नगरच्या नेप्ती उपबाजार समितीत ३७४ ट्रक म्हणजे ४१ हजार १४१ क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सरासरी ४०० ते ३१०० रुपये असा दर कांद्याला मिळाला. मागील लिलावाच्या तुलनेत यावेळी चांगली वाढ झाली आहे.

Pavana Dam : मित्रांसोबत पर्यटनासाठी गेलेल्या तरुणावर काळाचा घाला; पवना धरणात बुडून मृत्यू

त्यामुळे ऐन मान्सूनच्या आगमनालाच भाव वाढले असल्याने आता कांदा विक्री केली तर खरिपात पेरणीसाठी लागणाऱ्या खते व बियाणे खरेदी करण्यासाठी लागणारी रक्कम वेळीच उपलब्ध होणार आहे. यामुळे थोडा फार का होईना शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *