Maharashtra : हायवे, रेल्वे, लोकल अन् मेट्रो... नवी मुंबई विमानतळावर कोणत्या मार्गानं कसं जाल? वाचा सविस्तर

Maharashtra : नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ ३० सप्टेंबर रोजी सर्वसामान्यांसाठी सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबई आणि राज्यातील विविध भागातून विमानतळापर्यंत सुलभतेनं पोहोचण्यासाठी मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी योजनेला अंतिम रूप दिले आहे. यात रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि बससेवा एकत्रित करण्यात आल्या आहेत. जेणेकरून जवळपासच्या तसेच दुरच्या प्रवाशांची सोय होईल.

उद्घटनानंतर सुरूवातीला तासाला ८ ते १० विमाने उड्डाण होईल. २०२६पर्यंत प्रतितास ३० पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. एनएमआयए अधिकाऱ्यांच्या मते, विमानतळाचा पहिला टप्पा दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांना हाताळण्यासाठी डिझाईन केला आहे. त्याच्या सुरळीत कामकाजासाठी अॅप्रोच कनेक्टिव्हिटी महत्वाचा घटक असेल.

यासंदर्भात अधिकारी म्हणाले, 'NMIAL आगामी पायाभूत सुविधांचा वापर करून मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी विकसित करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांशी सक्रियपणे सहकार्य करत आहे. रस्ते, रेल्वे आणि वॉटर ट्रान्सपोर्ट या माध्यमांतून विनानतळ गाठणं सहज उपलब्ध होईल. यामुळे गर्दीचे व्यवस्थापन होईल', असे एनएमआयए प्रवक्त्यांनी सांगितले.

रस्ते कनेक्टिव्हिटी

या योजनेचा केंद्रबिंदू म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. २२ किमी लांबीचा अटल सेतू दक्षिण मुंबईतील शिवडीला नवी मुंबईतील न्हावा शेवाशी जोडतो. यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होतो. दक्षिण मुंबईतील प्रवासी अवघ्या २० मिनिटांत उलवे येथे पोहचू शकतील.

सायन पनवेल महामार्ग हा विमानतळाचा प्रमुख प्रवेशमार्ग असून, तो मुंबई शहराला चेंबूर, नेरूळ आणि बेलापूरमार्गे पनवेलशी जोडतो. तसेच Eastern Freeway हायवे हा देखील आणखी एक महामार्ग पर्याय आहे. हा महामार्गही दक्षिण मुंबईला थेट चेंबूरशी जोडतो.

याशिवाय सिडको नवी मुंबईचे नियोजन प्राधिकरणाकडून नवी मुंबई विमानतळाजवळ एक नवीन एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्यात येत आहे. हे नवीन एलिव्हेटेड कॉरिडॉर ठाणे ते नवी मुंबईशी जोडलेला असेल. सहा इंटरचेंज असलेल्या या मार्गामुळे प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून अवघ्या मिनिटांपर्यंत कमी होईल.

बस सेवा

MSRTC पुणे, ठाणे, दादर, वाशी आणि पनवेलसारख्या प्रमुख ठिकाणांहून, एअरपोर्ट एक्सप्रेस इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यात येणार आहे. या सेवांमध्ये इलेक्ट्रिक बसेस असतील.

रेल्वे आणि मेट्रो कनेक्टिव्हिटी

पनवेल रेल्वे स्थानकाला विमानतळासाठी फीडर पॉइंट म्हणून विकसित केले जात आहे. पुणे, रायगड, नाशिक आणि कोकण पट्ट्यातून येणारे प्रवासी पनवेलपर्यंत रेल्वेने येऊन विमानतळ शटल बसेसचा लाभ घेऊ शकतील.

प्रवाशांना कसं गाठता येईल नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ

दक्षिण मुंबईतील प्रवासी अटस सेतूमार्गे अवघ्या ४० मिनिटांत विमानतळावर पोहोचू शकतील.

ठाणेकरांना थेट विमानतळ एक्स्प्रेस बससेवेचा लाभ होईल.

पुणे आणि रायगडमधील प्रवासी पनवेलपर्यंत रेल्वेने येऊन शटल सेवांचा उपयोग करू शकतील.

उलवे, खारघर, कामोठे आणि पनवेलमधील स्थानिक प्रवाशांना फीडर बसेसची सोय उपलब्ध होईल.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *