Kalwa Hospital News : धक्कादायक! ठाणे मनपा रुग्णालयात एका रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश

Thane : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोठी दुर्घटना घडली आहे. या रुग्णालयामध्ये एकाच रात्रीमध्ये उपचार सुरु असलेल्या १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयातील अंदोगोंदी कारभार वारंवार समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वीच या रुग्णालयामध्ये एकाच दिवशी ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल संतप्त नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे सध्या ठाण्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशामध्ये एका रात्रीत या रुग्णालयामध्ये १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यामुळे खळबळ उडाली. या रुग्णालयामध्ये आयसीयूमध्ये उपचार सुरु असलेल्या १४ रुग्णांचा आणि जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरु असलेल्या ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Pune News: पुण्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार, ह्युंदाई कंपनी करणार ४ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक

शुक्रवारी या रुग्णालयात उपचार न मिळाल्याने५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला होता. त्यातच आता आणखी १७ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला आहे. रुग्णांना तपसण्यासाठी डॉक्टर येत नसून त्यांना वेळेवर औषध दिले जात नसल्याचा आरोप मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

शुक्रवारी रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हड यांनी रुग्णालयात धाव घेत प्रासनाला धारेवर धरत संताप व्यक्त केला होता. यावेळी जितेंद्र आव्हाडांसमोर नातेवाईकांनी एकच आक्रोश करत सर्व घटनाक्रम सांगितला होता.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply