India vs Sri Lanka : चेन्नईपासून सुरू झालेला विश्वकरंडकातील भारताचा विजयरथ आता क्रिकेटच्या पंढरीत आलाय आणि आज त्याची वानखेडे स्टेडियमवर थाटात सवारी होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र श्रीलंकेला कमजोर न समजता आपला बलशाली खेळ साकार केला तर एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरी निश्चित होईल आणि याच मैदानावर होणाऱ्या उपांत्य सामन्याची तयारीही करता येईल.
एका तपापूर्वी याच वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना झाला होता. धोनीच्या त्या ऐतिहासिक षटकारानंतर भारतासाठी इतिहास घडला होता. आता उद्याच्या सामन्यातही श्रीलंकाच प्रतिस्पर्धी आहे, मात्र परिस्थिती बदललेली आहे. भारत सर्व सामने जिंकून पहिल्या स्थानावर आहे, तर श्रीलंका दोन विजयांसह सातव्या क्रमांकावर आहे.
|
भारतीय संघ कमालीचा फॉर्मात आहे. हा विजयरथ रोखणे श्रीलंकेसाठी सोपे नसेल. दोन दिवसांपूर्वीच पुण्यात त्यांचा अफगाणिस्तानने पराभव केला होता. त्यामुळे मानसिकतेत बदल करून भारताला टक्कर देण्यासाठी श्रीलंकेला फार मेहनत घ्यावी लागेल. ही विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्याअगोदर झालेल्या आशिया करंडक स्पर्धेत भारताने श्रीलंकेचा धुव्वा उडवून विजेतेपद मिळवले होते, तेथून सुरू झालेला हा विजयरथ कायम आहे.
आजचा सामना जिंकून भारताने उपांत्य फेरी निश्चित केली तर याच वानखेडे स्टेडियमवर भारताचा उपांत्य सामना होईल. त्यामुळे हा सामना सरावाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे, पण पुढचा विचार करण्यापेक्षा रोहित शर्माचा संघ आजच्या सामन्यावरच लक्ष केंद्रीत करेल.
वानखेडेवर धावांचा पाऊस
या विश्वकरंडक स्पर्धेत वानखेडेवर दोन सामने झाले आहेत. हे दोन्ही सामने दक्षिण आफ्रिकेचे होते. त्यांनी बांगलादेशविरुद्ध ५ बाद ३८३, तर इंग्लंडविरुद्ध ७ बाद ३९९ धावांचा पाऊस पाडला होता. खेळपट्टी आणि जवळ असलेली सीमारेषा पाहता उद्या भारतीय संघाकडूनही तीनशेच्या पलीकडे धावा अपेक्षित आहेत.
खेळपट्टीचा फायदा घेण्यासाठी श्रीलंकेकडेही नावाजलेले फलंदाज असले तरी भारतीय गोलंदाजी फॉर्मात आहे. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांचा मारा खेळणे सर्वांनाच अवघड गेले आहे.
घरच्या मैदानावर चार मुंबईकर
कर्णधार रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर या चार मुंबईकरांसाठी हे घरचे मैदान आहे. यातील शार्दुलला पुन्हा एकदा राखीव खेळाडूतच राहावे लागेल; तर हार्दिक पंड्या अजून तंदुरुस्त न झाल्यामुळे श्रेयस अय्यरला आणखी एक संधी मिळेल, पण श्रेयसला आपला कच्चा दुवा बाजूला ठेवून आपली निवड सार्थ ठरवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील.
मोहम्मद सिराजचीही परीक्षा
याच श्रीलंकेविरुद्ध आशिया करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वादळी गोलंदाजी करून सहा विकेट मिळवणारा मोहम्मद सिराज त्यानंतर मात्र प्रभावहीन ठरत आहे. आता श्रेयस अय्यरप्रमाणे त्यालाही आपली जागा निश्चित ठेवण्यासाठी प्रभाव पाडावा लागणार आहे.
डेंगीच्या आजारातून परतणाऱ्या शुभमन गिलला स्पर्धेत एकच अर्धशतक करता आले आहे. त्यामुळे श्रेयस, सिराज आणि गिलसाठी हा सामना लय मिळवण्यासाठी महत्त्वाचा आहे.
शहर
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
- Sangram Thopate : पुण्यात काँग्रेसला खिंडार! संग्राम थोपटे आज शेकडो कार्यकर्त्यांसह 'कमळ' हाती घेणार
- Mumbai : थंड पाणी देण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, ५५ वर्षीय नरधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; बोरिवलीत खळबळ
- Pune : दुकानातून फक्त अंतर्वस्त्र चोरायचा, पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या, ७ लाखांचे कपडे हस्तगत
महाराष्ट्र
- Washim Water Scarcity : पाण्याचे भीषण संकट, प्रशासनाकडून गावाला ट्रॅकरही मिळेना; डोक्यावर हंडा घेऊन महिलांची जिल्हा परिषदेवर धडक
- Ajit Pawar: रिक्षात पुरुषाला बसवलं तर आधी फोटो काढा; अजितदादांचा बहिणांना मोलाचा सल्ला
- Ashwini Bidre Case : मोठी बातमी! अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप
- RTE Admission : शिक्षण हक्क कायद्याचा गैरवापर; रायगड जिल्ह्यात पालकांनी जोडले बोगस पुरावे
गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
- Mumbai : थंड पाणी देण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, ५५ वर्षीय नरधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; बोरिवलीत खळबळ
- Pune : दुकानातून फक्त अंतर्वस्त्र चोरायचा, पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या, ७ लाखांचे कपडे हस्तगत
- Pune : लोणी काळभोर भागात अफुची लागवड, पोलिसांचा छापा; महिला गजाआड
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Waqf amendment bill : नवा कायदा लागू, राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांच्याकडून वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी
- 250 Passengers Stranded in Turkey : लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमानाचं तुर्कीत लँडिंग, ४० तासांहून अधिक काळापासून २५० प्रवासी पडले अडकून
- Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकात कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत? त्यावरून वाद का निर्माण झाला?
- Kathua Encounter: जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, 'जैश'च्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ४ जवान शहीद