IND vs PAK Asia Cup 2022 : विराटची तुफान फलंदाजी, पाकिस्तानला विजयासाठी १८२ धावांची गरज

India vs Pakistan  : यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे. दोन्ही संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याआधी २८ ऑगस्ट रोजी हे संघ आमनेसामन आले होते. या सामन्यात भारताने पाच गडी राखून पाकिस्तानवर विजय मिळवला होता. त्यामुळे आजच्या समन्यात पाकिस्तान पराभवाचा वचपा काढणार की भारत आपली विजयी घोडदौड कायम ठेवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भारताकडून विराट कोहलीने तुफान फलंदाजी केली आहे. त्याने ४४ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या आहेत. भारताने पाकिस्तानसमोर १८२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.भारताला सातवा मोठा झटका बसला असून विराट कोहली धावाबद झाला आहे. कोहलीने ४४ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply