
पुणे : शहरांची झपाट्याने वाढत जाणारी लोकसंख्या, हवामानातील बदल यामुळे येणारी नैसर्गिक आपत्ती यावर जी २० परिषदेच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. भविष्यात शहरे कशी केली जात असताना त्यासाठीची पंचसूत्री ठरविण्यात आली असून, या त्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
शाश्वत शहरे, सर्वार्थाने सक्षमीकरण, नावीन्यपूर्ण वित्तीय प्रणाली, सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि लोककेंद्रीत शहरांचे नियोजन या पाच मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. पायाभूत सुविधांवर आणखी तीन बैठका होणार आहेत.
त्यामध्ये याच पाच मुद्द्यांना आधार मानून जी २० चे सदस्य देश चर्चा करून भविष्यातील धोरण निश्चित करतील. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाचे सहसचिव सॉलोमन अरोकियाराज यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पीआयबीच्या महासंचालक मोनिदीपा मुखर्जी उपस्थित होत्या.
पुण्यातील जे. एब्ल्यू. मेरिएट हॉटेलमध्ये १६ आणि १७ जानेवारी रोजी ‘जी २०’ परिषदेत इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपची (आयडब्ल्यूजी) बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत शहरातील पायाभूत सुविधांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला १८ सदस्य देश, ८ अतिथी देश आणि ८ आंतरराष्ट्रीय संघटनांचे ६४ प्रतिनिधी उपस्थित होते.
‘‘पुण्यात दोन दिवसीय बैठक झाली. यामध्ये पाककृती, संस्कृती, इतिहास जाणून प्रभावित झाले. परिषदेच्या तयारी उत्तम केल्याने आनंद व्यक्त केला’’, असे सांगत सॉलोमन अरोकियाराज म्हणाले, आयडब्ल्यूजी’ बैठकीत मेक्सिको येथे महापालिकांनी एकत्र येऊन ट्रस्ट स्थापन केले आहे.
बाँडच्या माध्यमातून निधी उभा करण्यासाठी एक यशस्वी मॉडेल विकसित केले आहे. त्याचे सादरीकरण करण्यात आले. भारतातील महापालिकांचे मूल्यांकन करण्यात आले असून त्यामध्ये ३५ महापालिकांचा यासाठी क्षमता आहे. त्यामुळे रोखे पद्धतीने प्रारूप विकसित करण्याचा विचार करता येईल, अशी चर्चा करण्यात आली.
आशियायी विकास बँकेने तीन कार्यशाळा घेतल्या. यामध्ये १४ तज्ज्ञांनी सहभाग घेऊन चर्चा केली. त्यात महापालिका प्रशासनाची क्षमता वाढविणे, जगभरातील शहरातील वित्तपुरवठ्याचे प्रारूप, पायाभूत सुविधांसाठी आर्थिक गुंतवणूक यावर चर्चा केली. याचा आशियायी बँकेकडून मसुदा तयार केला जाणार आहे. तसेच 'आयडब्ल्यूजी’ची पुढील बैठक विशाखापट्टणम येथे २८ आणि २९ मार्चला होणार आहे. त्यामध्ये पंचसूत्री आधार मानून चर्चा केली जाईल.
सध्या ५० टक्के लोकसंख्या शहरात राहत आहे, हा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. पण आर्थिक संधी आणि मिळणाऱ्या सुविधा यामुळे स्थलांतर रोखणे अशक्य आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा पुरविणे महत्त्वाचे ठरणार आहे अशी चर्चा बैठकीत करण्यात आली.
विकसित देश, विकसनशील देशातील प्रत्येक शहराचे प्रश्न वेगळे आहेत. तेथील आव्हाने भिन्न आहेत. त्यामुळे प्रत्येकासाठी वेगळी कार्यपद्धती असेल पण हे करताना शहरातील कार्बन उत्सर्जन कमी करणे, खासगी पद्धतीने निधी उभारणी करणे, नैसर्गिक स्रोतांवरील अवलंबित्व कमी करून त्यांचा पुनर्वापर करणे याची चर्चा झाली.
पुण्यात ‘जी २०’ परिषद होत असताना नागरिकांना पुण्यासाठी काय मिळणार असा प्रश्न नागरिकांमध्ये आहे असे विचारले असता त्यावर अरोकियाराज म्हणाले, ‘‘जी २०’ ही परिषद एका शहरासाठी किंवा देशाला काय मिळणार हे ठरविण्यासाठी होत नाही.
तर जगभरातील शहरांच्या विकासाचा वेध घेऊन त्यादृष्टीने धोरण ठरविणे, वित्त पुरवठा कसा करता येईल याचे निर्णय घेण्यासाठी आहे. या प्रक्रियेसाठी वेळ लागतो. पण या धोरणानुसार भविष्यात नवीन प्रकल्प, निधी पुरवठा होऊ शकतो, त्याचा उपयोग शहरांसाठी होईल. तसेच पायाभूत सुविधांचा विचार करून अनेक देश एका व्यासपीठावर येऊन चर्चा करत आहेत हे महत्त्वाचे आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




