पुणे : शहरांची झपाट्याने वाढत जाणारी लोकसंख्या, हवामानातील बदल यामुळे येणारी नैसर्गिक आपत्ती यावर जी २० परिषदेच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. भविष्यात शहरे कशी केली जात असताना त्यासाठीची पंचसूत्री ठरविण्यात आली असून, या त्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
शाश्वत शहरे, सर्वार्थाने सक्षमीकरण, नावीन्यपूर्ण वित्तीय प्रणाली, सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि लोककेंद्रीत शहरांचे नियोजन या पाच मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. पायाभूत सुविधांवर आणखी तीन बैठका होणार आहेत.
त्यामध्ये याच पाच मुद्द्यांना आधार मानून जी २० चे सदस्य देश चर्चा करून भविष्यातील धोरण निश्चित करतील. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाचे सहसचिव सॉलोमन अरोकियाराज यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पीआयबीच्या महासंचालक मोनिदीपा मुखर्जी उपस्थित होत्या.
पुण्यातील जे. एब्ल्यू. मेरिएट हॉटेलमध्ये १६ आणि १७ जानेवारी रोजी ‘जी २०’ परिषदेत इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपची (आयडब्ल्यूजी) बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत शहरातील पायाभूत सुविधांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला १८ सदस्य देश, ८ अतिथी देश आणि ८ आंतरराष्ट्रीय संघटनांचे ६४ प्रतिनिधी उपस्थित होते.
‘‘पुण्यात दोन दिवसीय बैठक झाली. यामध्ये पाककृती, संस्कृती, इतिहास जाणून प्रभावित झाले. परिषदेच्या तयारी उत्तम केल्याने आनंद व्यक्त केला’’, असे सांगत सॉलोमन अरोकियाराज म्हणाले, आयडब्ल्यूजी’ बैठकीत मेक्सिको येथे महापालिकांनी एकत्र येऊन ट्रस्ट स्थापन केले आहे.
बाँडच्या माध्यमातून निधी उभा करण्यासाठी एक यशस्वी मॉडेल विकसित केले आहे. त्याचे सादरीकरण करण्यात आले. भारतातील महापालिकांचे मूल्यांकन करण्यात आले असून त्यामध्ये ३५ महापालिकांचा यासाठी क्षमता आहे. त्यामुळे रोखे पद्धतीने प्रारूप विकसित करण्याचा विचार करता येईल, अशी चर्चा करण्यात आली.
आशियायी विकास बँकेने तीन कार्यशाळा घेतल्या. यामध्ये १४ तज्ज्ञांनी सहभाग घेऊन चर्चा केली. त्यात महापालिका प्रशासनाची क्षमता वाढविणे, जगभरातील शहरातील वित्तपुरवठ्याचे प्रारूप, पायाभूत सुविधांसाठी आर्थिक गुंतवणूक यावर चर्चा केली. याचा आशियायी बँकेकडून मसुदा तयार केला जाणार आहे. तसेच 'आयडब्ल्यूजी’ची पुढील बैठक विशाखापट्टणम येथे २८ आणि २९ मार्चला होणार आहे. त्यामध्ये पंचसूत्री आधार मानून चर्चा केली जाईल.
सध्या ५० टक्के लोकसंख्या शहरात राहत आहे, हा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. पण आर्थिक संधी आणि मिळणाऱ्या सुविधा यामुळे स्थलांतर रोखणे अशक्य आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा पुरविणे महत्त्वाचे ठरणार आहे अशी चर्चा बैठकीत करण्यात आली.
विकसित देश, विकसनशील देशातील प्रत्येक शहराचे प्रश्न वेगळे आहेत. तेथील आव्हाने भिन्न आहेत. त्यामुळे प्रत्येकासाठी वेगळी कार्यपद्धती असेल पण हे करताना शहरातील कार्बन उत्सर्जन कमी करणे, खासगी पद्धतीने निधी उभारणी करणे, नैसर्गिक स्रोतांवरील अवलंबित्व कमी करून त्यांचा पुनर्वापर करणे याची चर्चा झाली.
पुण्यात ‘जी २०’ परिषद होत असताना नागरिकांना पुण्यासाठी काय मिळणार असा प्रश्न नागरिकांमध्ये आहे असे विचारले असता त्यावर अरोकियाराज म्हणाले, ‘‘जी २०’ ही परिषद एका शहरासाठी किंवा देशाला काय मिळणार हे ठरविण्यासाठी होत नाही.
तर जगभरातील शहरांच्या विकासाचा वेध घेऊन त्यादृष्टीने धोरण ठरविणे, वित्त पुरवठा कसा करता येईल याचे निर्णय घेण्यासाठी आहे. या प्रक्रियेसाठी वेळ लागतो. पण या धोरणानुसार भविष्यात नवीन प्रकल्प, निधी पुरवठा होऊ शकतो, त्याचा उपयोग शहरांसाठी होईल. तसेच पायाभूत सुविधांचा विचार करून अनेक देश एका व्यासपीठावर येऊन चर्चा करत आहेत हे महत्त्वाचे आहे.
शहर
- Bhiwandi Crime News : सासऱ्याचा २० वर्षीय सुनेवर डोळा; खोलीत डांबलं, मित्रासह नवविवाहितेवर बलात्कार
- Pune Metro : पुणेकरांच्या कामाची बातमी! स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गात २ स्थानके वाढली; कोणत्या भागाला होणार फायदा?
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
महाराष्ट्र
- Fake Currency :1 लाख रुपयांच्या बदल्यात 6 लाखांच्या नोटा; नंदुरबार आणि कोल्हापूरमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट
- 10th Board : तिघांना अटक! झेरॉक्स केंद्रात उत्तरपत्रिका पोहोचली कशी?
- Ambernath : अंबरनाथ पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग, सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन
- MSRTC ST Bus Attack : बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली,मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- CBSE New Rule : दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा? सीबीएसई नवा नियम लागू करण्याच्या तयारीत
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर