मुंबई : ‘मशाल भडकली, भगवा फडकला. चिन्ह कोणतेही असो, जनता आमच्याच बरोबर आह’, हे आजच्या निकालाने स्पष्ट केले, असे परखड मतप्रदर्शन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी येथे केले. विरोधकांना पराभवाचा अंदाज आल्यानेच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचा टोलाही ठाकरे यांनी लगावला. तर आम्ही निवडणूक लढविली असती, तर आमचाच विजय झाला असता. आमच्या मदतीमुळेच ऋतुजा लटके यांना विजय मिळाला, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी स्पष्ट केले.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर लटके यांनी ज्येष्ठ नेते अॅड. अनिल परब यांच्यासह ठाकरे यांच्या ‘ मातोश्री ’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. विजयाबद्दल आनंद व्यक्त करून ठाकरे म्हणाले, लढाईची सुरुवातच विजयाने झाली आहे. ही लढाई वेगळी असल्याने शिवसेना कार्यकर्ते जोशात होते. पण आमचे पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठविण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले आणि त्यांचे कर्ते करविते निवडणूक रिंगणात आलेच नाहीत. विरोधकांनी पराभव होईल, हे लक्षात आल्याने निवडणूकच लढविली नाही. लढत न झाल्याने शिवसेना कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी पडले.
विरोधकांनी निवडणूक लढविली असती, तरी निकालावर काहीही परिणाम झाला नसता. नोटा पर्यायाला जी मते पडली आहेत, तीच मते विरोधकांना पडली असती, असा टोलाही ठाकरे यांनी भाजपला लगावला. ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार टीका केली. जमिनीवरचे प्रकल्प गुजरातला गेले आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रात आले. गुजरातची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे महाराष्ट्र प्रेम उफाळून आले आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी काही हवेतील प्रकल्प देण्याची घोषणा केली, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
भाजपचाच विजय झाला असता – शेलार
ऋतुजा लटके यांचा ५३ हजार ४७१ मतांनी विजय झाला. ऋतुजा लटके निवडून याव्यात, यासाठी भाजपने मदत केली व त्यांचा विजय सुकर झाला, असे सांगून मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशीष शेलार यांनी लटके यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले. मात्र लटके यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप व अन्य पक्षांनी पाठिंबा देऊनही फारसे मतदान झाले नाही. भाजपने निवडणूक लढविली असती, तर लटके यांचा पराभव निश्चित होता, असे शेलार यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा पाठिंबा लक्षात घेता लटके यांना किमान ९० हजाराहून अधिक मते मिळायला हवी होती. पण जनतेने त्यांच्याकडे पाठ फिरविली, असे मत शेलार यांनी व्यक्त केले.
रमेश लटके यांच्या कामांमुळे विजय – ऋतुजा लटके
रमेश लटके यांच्या कामांच्या पुण्याईचा हा विजय असल्याचे ऋतुजा लटके यांनी सांगितले. पोटनिवडणुकीत नेहमीच कमी मतदान होते. भाजपला जर आमच्याबाबत सहानुभूती असती, तर त्यांनी अर्जच भरला नसता. नोटा पर्यायाला जे मतदान झाले आहे, ते भाजपचेच असल्याचे सांगून निवडणुकीचा कौल लक्षात आल्यानेच त्यांनी माघार घेतली, असे लटके यांनी स्पष्ट केले.
नोटासाठी भाजपकडून प्रचार – अनिल परब
भाजपने मुरजी पटेल यांना माघार घेण्यास सांगितली आणि पडद्याआडून नोटा पर्याय निवडण्याबाबत प्रचारही केला, असा आरोप शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी केला. पण तरीही लटके यांचा मोठय़ा मताधिक्याने विजय झाल्याने मुंबईकरांच्या मनात काय आहे आणि ते उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत, हे दिसून आल्याचे परब यांनी सांगितले. नोटाचा वापर ऐच्छिक असून त्याचा प्रचार करता येत नाही. पण पैसे देऊन प्रचार करण्यात आला आणि पोलीस व निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याचे परब यांनी नमूद केले. मशाल चिन्ह मिळाल्यानंतर आमचा पहिला विजय असून महाविकास आघाडी एकत्र आली तर काय करू शकते, हे निकालातून स्पष्ट होत असल्याचेही परब यांनी सांगितले. या निकालाबाबत आत्मचिंतनाची गरज असल्याचे मत उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते उदय सामंत यांनी व्यक्त केले.
शहर
- Bhiwandi Crime News : सासऱ्याचा २० वर्षीय सुनेवर डोळा; खोलीत डांबलं, मित्रासह नवविवाहितेवर बलात्कार
- Pune Metro : पुणेकरांच्या कामाची बातमी! स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गात २ स्थानके वाढली; कोणत्या भागाला होणार फायदा?
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
महाराष्ट्र
- Fake Currency :1 लाख रुपयांच्या बदल्यात 6 लाखांच्या नोटा; नंदुरबार आणि कोल्हापूरमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट
- 10th Board : तिघांना अटक! झेरॉक्स केंद्रात उत्तरपत्रिका पोहोचली कशी?
- Ambernath : अंबरनाथ पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग, सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन
- MSRTC ST Bus Attack : बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली,मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- CBSE New Rule : दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा? सीबीएसई नवा नियम लागू करण्याच्या तयारीत
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर