Ajit Pawar : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाचं विकासपुरुष म्हणून ओळखलं जातं. जगातील जेवढी नेते आहेत त्यातून लोकप्रिय राजकीय नेते म्हणून मोदींना ओळखलं जातं. यामुळे त्यांना विजयी करण्यासाठी एक-एक खासदार दिल्लीला पाठवण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात त्यांच्यावर एकही घोटाळ्याचा आरोप झाला नाहीये, असं म्हणत अजित पवारांनी मोदींच्या कामाचं कौतुक केलंय.
अजित पवार यांनी साताऱ्यात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी उदयन राजे यांना भरभरून मतं द्यावीत असं आवाहन केलं. आपल्या भाषणात बोलताना अजित पवार म्हणालेत की, याआधी अनेक नेते पंतप्रधान झालेत. प्रत्येकावर काहींना काही आरोप झालेत.
|
राजीव गांधी यांच्यावरही बोफर्सचा आरोप झाला. त्यानंतर डॉ. मनमोहनसिंग यांच्यावरही २ जी, कोळसा खाणीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. आपली विचारधारा वेगळी आहे, फुले, शाहू महाराज यांच्या विचारधारेवर काम करणारा राष्ट्रवादी पक्ष आहे. पण विकासासाठी एक पाऊल पुढे एक पाऊल मागे व्हावे लागतं. या १० वर्षाच्या काळात पंतप्रधान मोदींच्यावर घोटाळ्याचा एकही आरोप झाला नसल्याचं अजित पवार म्हणालेत.
उदयनराजे भोसले हे साताऱ्याच्या गादीचे वारस आहेत. आज अनेक राजकीय पक्ष आपल्या सभांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत असतात. शिवाजी महाराज यांनी १८ पगड जाती एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याचं स्थापन्याचं काम केलं, हे आम्ही वारंवार सांगत असतो. हाच आदर्श आपल्या डोळ्यापुढे आहे. त्यामुळे विकासकामांबाबत चिंता करू नका. मी आपल्याकडे विकासकामांसाठी मते मागण्यासाठी आल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले.
नरेंद्र मोदींच्या या १० वर्षाच्या काळात अनेक विकासकामे झालीत. अनेक विमानतळ, रेल्वेस्थानकं, मेट्रोस्टेशन, वंदे भारत, अशी कामे केली गेली. नुसत्या पुण्यात १६ हजार कोटी रुपयांचा निधी विकासकामांसाठी देण्यात आलाय. राज्याच्या निधीला केंद्राची निधी जोड मिळाली तर आपल्या परिसराचा विकास अधिक होईल. त्यासाठी केंद्राचा निधी आणणायचा असेल तर मोदी सरकारच्या विचाराचा खासदार दिल्लीत पाठवला पाहिजे. म्हणून मी तुला येथे सांगतोय तुम्ही नेहमी घड्याळाला निवडणून दिलं. त्यामुळे आताही घड्याळाला निवडून द्या. महायुतीचा उमेदवाराला वाई, महाबळेश्वर, खंडाळा,येथून एक लाख अधिक मतांनी निवडून द्या, असं अजित पवार म्हणालेत.
भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही काळ युद्ध थांबवल्याचा दावा भाजप नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात करण्यात येतोय. आता अजित पवार यांनी हा दावा केलाय. साताऱ्यातल्या प्रचारसभेत बोलताना अजित पवार यांनी याचा उल्लेख केला. भारतीय विद्यार्थ्यांना युद्धातून बाहेर काढण्यासाठी मोदींना फोन केल्यानंतर त्यांनी तुम्ही काळजी करु नका असं म्हटलं आणि त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी फोन करून युद्ध काही काळ थांबवण्यास सांगितलं आणि भारतीय विद्यार्थ्यांना सोडवून आणलं होतं. त्या कामांसाठी दमदार नेता लागतो. ते वेड्या गबाळ्याचं काम नाही. धडाकेबाज नेत्यांचं काम असतं. असं अजित पवार म्हणाले.
शहर
महाराष्ट्र
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
- Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून 'या' भागात गारपीटचा येलो अलर्ट, अवकाळीचे ढग कायम
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं