Ajit Pawar : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महायुतीत लोकसभेच्या चार जागा अजित पवार गट लढवणार असल्याचे आज अजित पवारांनी जाहीर केले आहे. बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणारच आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या चार जागा आहेत. बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार जागा आहेत
अजित पवार म्हणाले, मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे. लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून आणायचे आहेत
School Bomb Threat : 15 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी! एकाच वेळी आला ईमेल |
बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागा आपण निवडणार आहोत. इतर जागांसंदर्भात आपण शिंदे, फडणवीसांशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करू. जागावाटपासंदर्भात या सगळ्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. आपल्या कार्यकर्त्याची ताकद पाहून आपण त्यांची निवड करणार आहोत
अजित पवार म्हणाले, काही जण आमच्यावर आरोप करतात की यांच्यावर केसेस होत्या म्हणून हे तिकडे गेले . मी कॅबिनेटमध्ये त्या खात्याचा मंत्री होतो म्हणून मला टार्गेट केलं गेलं पण ते आरोप सिद्ध झाले नाही. मंत्री आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ते आदेश दिले होते. राज्यात ते सातत्याने भारनियमन 2012 रोजी होत होतं ते आम्ही बंद केलं. आज माझ्याकडे अर्थ खातं आहे. सहा लाख कोटींचं बजेट आहे.
मी कमीटमेंट पाळणारा नेता : अजित पवार
माझ्यावर जे आरोप झाले जलसंपदा विभागाची त्यानंतर त्याचा विकास रेंगळाला. मी कामाला मान्यता देतो म्हणुन मला टार्गेट करण्यात आलं. त्यावेळी नेमलेल्या समितीचा अहवाल आला आणि त्यांनी मला क्लीन चीट दिली. 32 वर्ष मी काम करतोय मला विचारलं जातं माझ्यावरच आरोप का होतात. परंतु मी कमीटमेंट पाळणारा नेता आहे. माझ्याकडे जीएसटी विभाग देखील होता. माझ्यावर आजपर्यंत कुठल्याही डीपीसीसंदर्भात आरोप नाही. काम व्हावी हीच कार्यकर्त्यांची अपेक्षा असते.
विकासकामाच्या बाबतीत जिल्हाध्यक्षांना प्राधान्य : अजित पवार
विकासकामांच्या बाबतीत पहिलं प्राधान्य राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना, दुसरं खासदारांना तर तिसरं राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना असणार आहे. युवती संघतेनेत काही वाद आहेत ते अदिती तटकरेने ते वाद मिटवावेत त्यामुळं युवती विभागाची जबाबदारी घे. जास्तीत जास्त महिलांचे प्रश्न सोडवायला संधी मिळेल, असे देखील अजित पवार म्हणाले.
उरलेल्या मंत्र्यांनाही पालकमंत्रीपद मिळावं यासाठी प्रयत्नशील : अजित पवार
सध्या असलेल्या पालकमंत्र्यांशिवाय उरलेल्या मंत्र्यांनाही पालकमंत्रीपद मिळावं यासाठी चर्चा करून लवकरत लवकर निर्णय घेणार आहे. आम्ही राहिलेल्या मंत्र्याबाबत देखील पालकमंत्री पद देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. इतर नेत्यांसोबत लवकरच या विषयांवर बसणार आहे.
आपण आपली विचारधारा सोडलेली नाही : अजित पवार
अनेक वर्ष संघटनेत काम करत आहोत. 2004 साली जे घडलं होतं ते मला काल कळलं. आधीच्या जनसंघाबाबत बोलल जातं होतं की जातीयवादी पक्ष आहे त्यामुळं आपण भाजप शिवसेनेपासून लांब राहत होतो. आता काळ बदलला आहे. अटलबिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झाले. आपण आपली विचारधारा सोडलेली नाही. मी मुस्लिम समाजाला सांगू इच्छितो. आपण भाजप एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत परंतु बाबासाहेब आंबेडकर यांनी जो विचार सांगितला त्याचं मार्गावर चाललो आहे.
दिलेला शब्द पाळा कोणाला नाराज करू नका : अजित पवार
10 जून 1999 पवार साहेबांनी या पक्षाची घोषणा केली तेव्हा त्याचा सगळ्यात जास्त समर्थन, पुढाकार महाराष्ट्रातून होता. मी जरी संघटनेचा पदाधिकारी त्या काळात नसलो तरी संघटनेचं काम कोण करत होतं हे सगळ्यांना माहिती आहे. राज्यात पक्षाच्या इमारती उभारण्याचं काम आम्ही केलं. 2019 मधे प्रकाश साळुंखेंना मंत्री व्हायचं होतं, ते नाराज होते. प्रकाश साळुंखे राजीनामा देण्याच्या तयारीत होते. त्य़ांना मी, जयंत पाटील यांना खूप समजावलं, त्यांनी कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी जयंत पाटील म्हणाले मी एक वर्ष अध्यक्ष राहतो, काम करतो मग तुम्हाला जबाबदारी देऊत्यानंतर मी जयंत पाटलांना आठवण करून दिली. मात्र जयंत पाटील पुढे ढकलत राहिले..मंत्रीपद ठेवा आणि अध्यक्षपद यांना द्या. मी म्हणतो एकदा शब्द दिला की तो पाळा ना..कुणाला नाराज करू नका, संघटनेसाठी केलेल्या या बारिक बारिक गोष्टी साठत राहतात आणि मग त्यांचा अशा पद्धतीने उद्रेक होतो
शहर
महाराष्ट्र
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
- Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून 'या' भागात गारपीटचा येलो अलर्ट, अवकाळीचे ढग कायम
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं