Ajit Pawar : राज्यात अवकाळी पावसाचा फटका; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक

Ajit Pawar : राज्यातील गारपिटीने आणि अवकाळीने नुकसान झालेल्या भागाची माहिती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची बैठक बोलावली असल्याची माहिती समोर आली आहे. आज संध्याकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राज्यातील नुकसानाचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर केंद्राकडून अवकाळी आणि गारपिटीने फटका बसलेल्या शेतीला मदत मिळवण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

राज्य सरकारकडून सध्या केंद्र सरकारकडे चाळीस दुष्काळी तालुक्यांसाठी २६०० कोटींच्या मदतीची मागणी केली आहे. पुढील दहा दिवसात राज्यातील नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे तयार करून अहवाल सादर करण्याचे सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या भागाचा अहवाल प्राप्त होताच केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

Sakri News : दरोडेखोरांनी अपहरण केलेल्या तरुणीची सुटका; संशयित आरोपीही ताब्यात

बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

ऐन हिवाळ्यात राज्याच्या अनेक ठिकाणी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात गारांसह पाऊस झाल्यामुळे शेती पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यासंबधीचे वृत्त साम टिव्ही मराठीने दिले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply