Pune : विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडील १२ मते शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) जयंत पाटील यांना दिली. त्याच वेळी काँग्रेस आणि शिवसेनेनेही उमेदवार उभा केला. मात्र, विधान परिषदेतील निवडणुकीतील डावपेचात मतभिन्नता झाली. त्यामुळे पाटील यांचा पराभव झाला. पक्षाला कोणी फसविले नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन, तर महायुतीचे नऊ उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर निवडणुकीतील उमेदवार होते; तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेकापचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता. मात्र, पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पराभवाचे कारण स्पष्ट केले.
ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढताना शेकापसह अन्य घटक पक्षांनी काही जागा मागितल्या होत्या. मात्र, त्या जागा त्यांना मिळाल्या नाहीत. त्यामुळे विधानपरिषद व आगामी विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांना संधी देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडील १२ मते जयंत पाटील यांना देण्यात आली. काँग्रेसकडे ३७, शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे १६ मते होती. काँग्रेसने त्यांच्याकडील सर्व ३७ मते त्यांच्याच उमेदवाराला द्यायला हवी होती. दुसऱ्या क्रमांकाची मते विभागून शिवसेना व शेकापच्या उमेदवाराला मिळणे आवश्यक होते. पहिल्या पसंतीची मते आवश्यकतेपेक्षा जास्त असल्याने ती विभागली जातील आणि दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला मिळतील, असे धोरण आखले असते, तरी चित्र वेगळे दिसले असते.
Pune : बाल न्याय मंडळातील दोन सदस्यांवर कारवाईची शिफारस, कल्याणीनगर अपघात प्रकरण |
राज ठाकरेंवर टीका
गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून राज्यात जातीय तेढ निर्माण झाल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाजमाध्यमातून दिली आहे. याबाबत पवार यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता ते म्हणाले, ‘असे बोलणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. दोन-चार, आठ-दहा दिवसांनी किंवा महिन्यांनी जागे झाले, की ते अशी विधाने, टिप्पणी करतात.’
‘इंडियन एक्स्प्रेस’ आणि ‘लोकसत्ता’ वाचतो!
अजित पवारांबरोबर युती केल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारांच्या साप्ताहिक विवेकमध्ये करण्यात आली आहे. याबाबत ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा दाखला देत शरद पवार म्हणाले, ‘मी दिल्लीत असलो की ‘इंडियन एक्स्प्रेस’ हे इंग्रजी वर्तमानपत्र, तर मुंबईमध्ये असलो की ‘लोकसत्ता’ सर्वप्रथम वाचतो.’ पत्रकारितेसंदर्भात भाष्य करताना ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अन्य मित्रांसोबत वर्तमानपत्र सुरू केले होते. मी एका वर्तमानपत्रात बातमीदार म्हणून काम केले आहे. अलीकडे माध्यमांचा प्रभाव वाढला आहे. वृत्तपत्र आणि माध्यमांमागे अदृश्य शक्ती आहे.
महाविकास आघाडीत नेतृत्वाचा प्रश्नच नाही
पुणे : राज्यातील राजकीय अस्थिरता दूर करण्याची आवश्यता आहे. नागरिकांनाही बदल हवा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे उत्तम चालेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. महाविकास आघाडीमध्ये नेतृत्वावरून कोणताही वाद नाही आणि नेतृत्वाचा प्रश्नही उद्भवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे श्रमिक पत्रकार संघातील वार्तालाप कार्यक्रमावेळी पवार यांनी हा दावा केला.
लोकसभा निवडणुकीनंतर बहीण, भावांची आठवण
आमचा प्रशासकीय यंत्रणेशी सुसंवाद होता. मात्र, अलीकडे हवे तसे निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढली आहे. अधिकाऱ्यांना आदेश दिले जातात. जयंत पाटील आणि अजित पवार यांनी अनेक अर्थसंकल्प सादर केले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर सरकारला बहीण आणि भावांची आठवण झाली आहे, अशी टीका त्यांनी सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून केली.
शहर
- Deenanath Hospital : १० लाख स्वतःसाठी मागितले नव्हते; डॉ.सुश्रुत घैसासवर दाखल झालेला गुन्हा चुकीचा: IMA
- Pune : बांधकामांच्या पर्यावरण मंजुरीचा तिढा सोडविणार, ‘क्रेडाई’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
- Shocking News: झिपलायनिंग करणं जीवावर बेतलं, ३० फूट उंचीवरून पडून तरुणीचा मृत्यू
- Pune News : इन्स्पेक्टरच्या खुर्चीत ऐटीत बसला, पोलीस कर्मचाऱ्याचा फोटो लिक; पण फोटो व्हायरल झालाच कसा? याच्या तपासावर भर
महाराष्ट्र
- Washim Water Scarcity : पाण्याचे भीषण संकट, प्रशासनाकडून गावाला ट्रॅकरही मिळेना; डोक्यावर हंडा घेऊन महिलांची जिल्हा परिषदेवर धडक
- Ajit Pawar: रिक्षात पुरुषाला बसवलं तर आधी फोटो काढा; अजितदादांचा बहिणांना मोलाचा सल्ला
- Ashwini Bidre Case : मोठी बातमी! अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप
- RTE Admission : शिक्षण हक्क कायद्याचा गैरवापर; रायगड जिल्ह्यात पालकांनी जोडले बोगस पुरावे
गुन्हा
- Pune : लोणी काळभोर भागात अफुची लागवड, पोलिसांचा छापा; महिला गजाआड
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- 250 Passengers Stranded in Turkey : लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमानाचं तुर्कीत लँडिंग, ४० तासांहून अधिक काळापासून २५० प्रवासी पडले अडकून
- Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकात कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत? त्यावरून वाद का निर्माण झाला?
- Kathua Encounter: जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, 'जैश'च्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ४ जवान शहीद
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे