
सांगली : जतच्या दुष्काळी भागातील गावांना पाणी देण्यासाठी विस्तारित योजनेसाठी जानेवारीपर्यंत निविदा काढण्यात येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जाहीर केले असले तरी याच विधानाला जतचे माजी आमदार भाजप नेते विलासराज जगताप यांनी आव्हान दिले असून या पद्धतीची दिशाभूल करणारी वक्तव्ये टाळून प्रत्यक्ष कृती काय करणार हे सांगण्याचा आग्रह धरला आहे.
या निमित्ताने श्रेयवाद रंगला असतानाच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाण्याबरोबरच हाताला काम देण्यात हे सरकार प्रयत्नशील राहील याची ग्वाही देत असताना नव्या वर्षांची पहाट आनंददायी असेल असे सांगत सीमावर्ती भागातील दुखण्यावर फुंकर मारण्याचा प्रयत्न केला आहे. जतमधील ४० गावांवर कर्नाटकने दावा सांगत असतानाच हा दावा अधिक सक्षम करण्यासाठी तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी जत पूर्व भागातील गावांना नैसर्गिक प्रवाहाने आले आहे. या पाण्याने रात्रीच्या केवळ बारा तासांत पूर्व भागातील महत्त्वाचा समजला जात असलेला तिकोंडी तलाव तुडूंब भरून वाहू लागला आहे. पाण्याच्या निमित्ताने सीमाभागात राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे असलेल्या असंतोषाला खतपाणी घालण्याचा खोडसाळपणा कर्नाटक करत असताना राज्यात मात्र राजकीय कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. गेली ४० वर्षे जतकरांना म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे गाजर दाखवून निवडणुका लढविल्या गेल्या.
विस्तारित म्हैसाळ योजनेला अद्याप तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता नसताना जानेवारीमध्ये निविदा काढून येत्या दीड वर्षांत योजना मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. या योजनेसाठी १९५० कोटींचा निधी लागणार आहे. जतच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या मूळच्या योजनाही दोन-तीनशे कोटींसाठी अडली आहे. असे असताना नव्याने दोन हजार कोटींचा निधी कसा उपलब्ध होणार याबाबत भाजपच्या नेत्यांच्या मनातच साशंकता आहे.
या सर्व तांत्रिक बाबी असल्या तरी जतचा पाणीप्रश्न सुटावा असे खऱ्या अर्थाने वाटत असते तर शुक्रवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये बोलावण्यात आलेल्या बैठकीला जतमधील सर्वपक्षीय नेत्यांना का आमंत्रित करण्यात आले नाही, असा रास्त सवाल उपस्थित केला जात आहे. याचबरोबर पाणी संघर्ष समितीलाही या बैठकीला बोलावण्यात आले नाही. नेमका प्रश्न काय आहे, त्यावर दीर्घकालीन व तात्कालिक उपाय काय असू शकतो याचा सारासारविचार न होता, केवळ दिशाभूल करणारी आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याची वृत्ती निश्चितच भविष्याच्या दृष्टीने आत्मघातकी ठरू शकेल, अशी साधार भीती सीमावर्ती भागाला आहे.
राजकीय गणिते या बैठकीला केवळ पालकमंत्री, खासदार उपस्थित होते. जगताप हे भाजपमधील बडे प्रस्थ असले तरी त्यांनाही पक्षांतर्गत गटबाजीचा सामना करावा लागत असावा. जगताप यांचे वक्तव्य विद्यमान काँग्रेस आमदाराबरोबरच खासदार यांच्या विरोधातील संघर्षांतही दडलेले असू शकते. मात्र त्यांनी या वक्तव्याबाबत आमदारांना धारेवर न धरता मुख्यमंत्री शिंदे यांनी दिशाभूल टाळावी असे सांगत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांच्यात फार मोठे सख्य अद्याप निर्माण झाले नसल्याचे अधोरेखित केले आहे. आ. शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघालगतच जत तालुका असल्याने त्याचेही धागेदोरे जतमध्ये दिसले तर नवल नाही.
मुंबईमध्ये जतच्या पाणीप्रश्नावर झालेल्या बैठकीस जलसंपदा, अर्थ या विभागाचे सचिवच उपस्थित नसताना विस्तारित योजनेबाबत मुख्यमंत्री धोरणात्मक निर्णय कसे जाहीर करू शकतात. या बैठकीस पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. त्यांनी दोनशे कोटींचा दिलेला निधी हा जलजीवन मिशन योजनेसाठी असून ही बैठक पाणीपुरवठय़ाचीच होती. तरीही म्हैसाळ विस्तारित योजनेबाबत चर्चा होउन जानेवारीपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची घोषणा करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.
– विलासराव जगताप, माजी आमदार
जतचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी बैठकीला आमंत्रण नाही हाच मुळात माजी आमदार विलासराव जगताप यांचे दुखणे आहे. गेली चाळीस वर्षे राजकारणात असूनही त्यांनी वंचित गावासाठी नेमके काय केले याचे उत्तर देण्यासाठी त्यांचे कर्तव्य उणे पडत असल्यानेच त्यांनी आता श्रेयवादासाठी वाद उकरून काढण्याचा प्रयत्न चालविला आहे.
– विक्रमसिंह सावंत, काँग्रेस आमदार
जत पूर्व भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या ४२ गावांतील लोकांची नव्या वर्षांतील पहाट आनंददायी ठरविण्याचे शिंदे-फडणवीस सरकार निश्चितपणे करेल. मात्र केवळ पाणी देणे म्हणजेच विकास नव्हे तर येथील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिक वसाहत विकसित करून उद्योग आणण्याचे प्रयत्नही केले जातील.
-उदय सामंत, उद्योगमंत्री
शहर
- खान सरांच्या अडचणीत वाढ! गोळीबार आणि तोडफोड प्रकरणी पाटणा न्यायालयात धाव, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज.
- अंबरनाथच्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले; ७/१२ उताऱ्यासाठी केली होती मागणी.
- भारतीय संघात मोठा फेरबदल! इंग्लंड दौऱ्यासाठी श्रेयस अय्यर कर्णधार, सूर्यकुमार यादवला डच्चू.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
महाराष्ट्र
- खान सरांच्या अडचणीत वाढ! गोळीबार आणि तोडफोड प्रकरणी पाटणा न्यायालयात धाव, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज.
- अंबरनाथच्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले; ७/१२ उताऱ्यासाठी केली होती मागणी.
- भारतीय संघात मोठा फेरबदल! इंग्लंड दौऱ्यासाठी श्रेयस अय्यर कर्णधार, सूर्यकुमार यादवला डच्चू.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
गुन्हा
- अंबरनाथच्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले; ७/१२ उताऱ्यासाठी केली होती मागणी.
- लग्नाचा मांडव उखडलाही नव्हता तोच घात! लग्नानंतर अवघ्या १२ व्या दिवशी २६ वर्षीय तरुण तलाठ्याची आत्महत्या; पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- पुणे: नसरापूर नराधम आरोपी भीमराव कांबळे विरोधात खटल्याला वेग; विशेष न्यायालयात साक्षीदारांचे जबाब नोंदवणे सुरू!
- दिल्ली विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापिकेची घरातच हत्या; ओळखीच्या व्यक्तीचाच हात असल्याची शक्यता!
राजकीय
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा






















Subscribe to my channel




