भाजपा-शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असून राज्यातील नवीन सरकारवर शिक्कामोर्तब झालं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना एकनाथ शिंदेचं तोंडभरुन कौतुक केलं. तसंच यावेळी त्यांनी मी पुन्हा येईन वाक्यावरुन टिंगटटवाळी करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. अनेकवेळा राजकारणात पद मिळाल्यानंतर माणुसकी हरवतात, पण एकनाथ शिंदे यांच्यात प्रचंड माणुसकी आहे असं कौतुक देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
“महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही असं म्हटल्यानंतर अनेकांनी माझी टिंगलटवाळी केली. मी पुन्हा येईन म्हटलं होतं. मी पुन्हा आलोच नाही तर यांनाही घेऊन आलो आहे. ज्यांनी अपमान, टिंगलटवाळी केली त्यांचा मी बदला घेणार. मी त्यांना माफ केलं हाच माझा बदला आहे. राजकारणात अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. सर्वांना संधी मिळते,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
“एकनाथ शिंदे एक वेगळं रसायन आहे, झोपतात कधी आणि जेवतात कधी कळत नाही. २४ तास काम करणारा हा नेता आहे. एखादी निवडणूक, अडचण असते तेव्हा तीन दिवस सलग ते काम करताना दिसतात. मोठ्यातल्या मोठं किंवा लहान व्यक्तीच्या मदतीला जाण्याची शिकवण त्यांना दिघेंनी दिली आहे. ज्यांचं कोणी नाही त्यांचे आनंद दिघे होते. हीच शिकवण त्यांनी एकनाथ शिंदेंना दिली आहे,” असं फडणवीस म्हणाले.
“लोकशाहीत दुसरा आवाज पटो किंवा न पटो ते ऐकून घेतलं पाहिजे. प्रत्युत्तर देण्यात काही चुकीचं नाही,” असंही फडणवीस म्हणाले. “महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात अडकली असता तात्काळ एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांना फोन केला होता. त्यादिवशी उद्धव ठाकरेंंचा वाढदिवस होता. मी त्यांना सगळे कार्यक्रम सोडून पोहोचण्यास सांगितलं. बोटीतून साप शिरत असतानाही त्यांनी प्रवास केला होता. काही पत्रकार अडकले होते त्यांनीही प्रत्यक्ष हे पाहिलं. आदिवासींच्या मोर्चाची व्यवस्थाही त्यांनी केली.
“एकनाथ शिंदे आजही ४००-५०० लोकांना भेटतात. मुख्यमंत्र्यांनी थोडी वेळ पाळली पाहिजे हे मी त्यांना सांगितलं आहे. माणसं भेटली की ते रमतात, समस्या ऐकून घेतात,” असं फडणवीसांनी सांगितलं. शिंदे यशस्वी मुख्यमंत्री होतील. त्यांच्यात खूप संयम आहे. त्यातूनच त्यांची जडण घडण झाली असावी असंही ते म्हणाले.
“शिंदेंनी बेताच्या स्थितीत नेतृत्व उभं केलं. त्यांची दोन मुलं अपघातात गेली तेव्हा कुटुंब तुटलं होतं. जीवनातलं सगळं संपलं असा भाव त्यांच्यात निर्माण झाला होता. त्यावेळी दिघेंनी त्यांना ऊर्जा दिली आणि खरं नेतृत्व उभं केलं. नंतर त्यांनी स्वतपेक्षा जनतेचा विचार केला पाहिजे यातून काम सुरु केलं,” असं फडणवीसांनी सांगितलं.
“काही लोकांना आम्ही सत्तेसाठी काही करत आहोत असं वाटलं होतं. सत्ता आमचं साधन आहे. सामान्य माणसाच्या जीवनात सामाजिक, आर्थिक परिवर्तन करण्यासाठी उपकरण महणून आम्हाला सत्ता हवी आहे,” असं फडणवीस म्हणाले.
“माझ्या नेत्याने मला उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितलं. ज्या पक्षाने मला सर्वोच्च स्थानावर बसवलं त्यांनी घरी बसण्यास सांगितलं असतं तर तेही केलं असतं,” असंही ते म्हणाले. एकनाथ शिंदेंच्या पाठीशी पूर्ण ताकद आणि क्षमतेने मी उभा आहे. कारकीर्द अधिक यशस्वी करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यांच्यात, माझ्यात कधी दुरावा, संघर्ष कुरघोडी दिसणार नाही असंही ते म्हणाले. ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र आहे असाही टोला त्यांनी लगावला.
शहर
महाराष्ट्र
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
- Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून 'या' भागात गारपीटचा येलो अलर्ट, अवकाळीचे ढग कायम
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं