
पुणे : उत्तरेकडील राज्यांत तापमानाचा पारा घसरल्याने तेथून येणारे वारे आणि कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच रात्रीच्या किमान तापमानाचा पारा १० अंशांखाली गेला असून, रविवारी जळगाव येथे राज्यातील नीचांकी ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
पुणे, नाशिक, औरंगाबादचेही किमान तापमान १० अंशांखाली नोंदविले गेले. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. मुंबई परिसरासह कोकण विभागातही सरासरीच्या तुलनेत तापमान कमी झाले आहे. पुढील दोन दिवस तापमानातील घट कायम राहणार असून, त्यानंतर तापमानात काही प्रमाणात चढ-उतारांचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यात गेल्या आठवडय़ात काही भागांत अंशत: ढगाळ वातावरण होते. त्यामुळे तापमानात किंचित वाढ झाली होती. त्यानंतर सर्वत्र निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे किनारपट्टीचा भाग वगळता इतरत्र तापमान सरासरीच्या खाली गेले होते. मुंबईसह कोकणाच्या किनारपट्टीच्या भागात रात्रीचे किमान तापमान सरासरीजवळ होते. सध्या हिमालयीन विभाग, जम्मू-काश्मीर, लडाख आदी भागांत काही ठिकाणी बर्फवृष्टी होत आहे. त्या भागातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आणि कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे उत्तर आणि उत्तर-पश्चिम भागातील तापमानाचा पारा घसरला आहे. संबंधित राज्यांत बहुतांश भागांत पारा १० अंशांखाली गेला आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यातही थंडीला पोषक स्थिती निर्माण झाली असून, किमान तापमानात मोठी घट होऊन थंडीचा कडाका वाढला आहे.
सध्या बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्याचा परिणाम म्हणून तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि जवळच्या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. काही भागांत सध्या पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यातही काही ठिकाणी पुन्हा अंशत: ढगाळ स्थिती निर्माण होऊ शकते. त्यातून राज्याच्या तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होऊन थंडीचा कडाका कमी होण्याची शक्यता आहे. थंडीचा कडाका कमी होणार असला, तरी उत्तरेकडील तापमानात आणखी घट होणार असल्याने गारवा कायम राहणार आहे.
तापमानात घट कुठे?
रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाल्यामुळेच थंडीचा कडाका वाढला आहे. नीचांकी तापमानाची नोंद झालेल्या जळगावमध्ये सरासरीच्या तुलनेत पारा ६ अंशांनी घसरला आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगलीमध्ये तापमानात ३ ते ५ अंशांनी घट झाली आहे. मराठवाडय़ात औरंगाबाद, परभणीत सरासरीच्या तुलनेत तापमान ४ ते ५ अंशांनी घटले आहे. विदर्भातही तापमानात मोठी घट असून, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा आदी भागांत तब्बल ४ ते ६ अंशांनी तापमान घटले आहे. कोकण विभागात १ ते ४ अंशांची घट आहे.
किमान तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे (९.७), जळगाव (८.५), कोल्हापूर (१५.२), महाबळेश्वर (१०.६), नाशिक (९.८), सांगली (१३.३), सातारा (१२.६), सोलापूर (१४.६), मुंबई (२२.२), सांताक्रुझ (१९.८), रत्नागिरी (१९.७), डहाणू (१७.०), औरंगाबाद (९.२), परभणी (११.५), नांदेड (१२.६), अकोला (१२.८), अमरावती (११.७), बुलढाणा (१३.०), ब्रह्मपुरी (१३.१), चंद्रपूर (१३.२), गोंदिया (१०.४), नागपूर (११.४), वाशिम (१३.०),वर्धा (१२.४)
शहर
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
महाराष्ट्र
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
गुन्हा
- ८ वर्षांनंतर न्याय! दिल्लीतील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार राजू सिंह दोषी; महिलेचा घेतला होता बळी.
- मध्य प्रदेश: एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला; छताला लटकवून दिला फास.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- ५ वाजताची डेडलाईन! अभिजीत दिपकेच्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी; दिल्ली पोलिसांचे कडक नियम लागू!
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
























Subscribe to my channel




