देवेंद्रजींच्या नेतृत्वात हे सुनियोजित षडयंत्र सुरू आहे; शाईफेकीच्या घटनेवरुन सुषमा अंधारेंचे फडणवीसांवर गंभीर आरोप

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरूषांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आली होती. यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांसह अनेक संघटनांचा समावेश होता. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यादेखील पुणे बंदची हाक देत रस्त्यावर उतरल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. हे सुनियोजित षडयंत्र आहे जे देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात सुरू आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. 

चंद्रकात पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या, शाईफेक झाले याचे मला वाईट वाटत आहे. तुमच्यावर एकदा शाई फेकण्यापेक्षा साठवली पाहीजे आणि प्रत्येकाने बोटाला लावली पाहीजे. बॅलेट बॅाक्समधून संविधानिक मार्गाने वापरली पाहीजे. शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे या तरुणाबद्दल सुषमा अंधारे म्हणाल्या की, तुम्ही ३०७ कसा लावला? पोलिस सिक्यूरिटी मनोजला गरबडेला नव्हती, तो समोरून आला तुम्ही मनोजवर ३०७ दाखल करता. होय हे षडयंत्र आहे, पण षडयंत्र तुमच्या मनुवादी नेत्यांकडून आखण्यात आलं आहे असा टोला त्यांनी लगावला आहे. (Sushma Andhare In Pune Bandh)

सुषमा अंधारे यांनी यावेळी राज्यपालांसह भाजप नेत्यांवरही टीका केली आहे. अंधारे म्हणाल्या, राज्यपाल पद याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे पण त्यावर बसलेली व्यक्ती आदराच्या लायकीची नाही. जे वक्तव्य सातत्याने चालू आहेत कोश्यारी हे राज्यपाल असल्याचे विसरत आहेत. जेव्हा जेव्हा ते महापुरुषांबद्दल बोलले तेव्हा ना मुख्यमंत्र्यांनी थांबवले ना उपमुख्यमंत्री यांनी आणि ना ४० चुकार भावांनी देखील त्यांना थांबवले नाही असा टोला त्यांनी लगावला. तसेच आता प्रसाद लाड इतक्या लाडात आले की आमच्या डोक्यावर प्रसाद वाटायला लागले असंही त्या म्हणाल्या. हे सुनियोजित षडयंत्र आहे जे देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात सुरू आहे असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

पुढे त्या म्हणाल्या, मोदींना जेव्हा खरगे हे रावण म्हणले होते तेव्हा ते आलाम पणाहसाठी बोलण्यासाठी पुढे आले. भाजप किती दुटप्पी आहे हे प्रमाण आहे. टीम देवेंद्र यांनी निंदाजनक ठराव मांडला नाही. चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी माझे नाव घेतले. तुमच्यावर शाईफेक ही होऊ नये हे मनापासून वाटतं. तुमच्यावर एकदा शाई फेकल्यापेक्षा ती शाई एकत्र साठवली गेली पाहिजे. प्रत्येकाने ती शाई आता संविधानिक पद्धतीने मांडली पाहिजे ते ही बॅलेट बॉक्समधून असं आवाहन सुषमा अंधारे यांनी केलं. तसेच चंद्रकांत पाटील तुम्ही लोकशाहीच्या गप्पा मारू नका, तुमच्या पक्षातील मनुवादी लोकांनीच हे षडयंत्र रचले आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
 
सुषमा अंधारे यांनी शाई फेक करणाऱ्या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्याचं समर्थन केलं आहे. मनोज गरबडे यांच्यासाठी महाराष्टातील वकील सेना उभी आहे. सबंध महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे असं त्या म्हणाल्या.
 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *