डॉ. सामी महरूम यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎सरकारला जनतेचा विश्वास‎ मिळवून देण्यास एआय सक्षम‎

लोकशाही सरकारांवरील जनतेचा अविश्वास वाढला‎आहे. हे चिंता निर्माण करणारे आहे. त्यातच आता‎एआय चुकीच्या माहितीचा प्रचार करून आणि‎तथ्यांवरील विश्वास कमी करून हे संकट वाढवेल,‎अशी भीती अनेकांना वाटते. परंतु हे देखील शक्य आहे‎की नवीन एआय साधने लोकशाहीवरील विश्वासाच्या‎संकटावर उपाय बनू शकतात!‎ ओईसीडीच्या मते त्यांच्या सदस्य देशांमधील सरासरी‎फक्त 39% नागरिक त्यांच्या सरकारांवर विश्वास‎ठेवतात. 2021 मध्ये हा आकडा 45% होता. अमेरिकेत‎प्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार सरकारवरील विश्वास ‎‎ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे - सुमारे ‎‎17%. फ्रान्स, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्येही असेच ‎‎आकडे आहेत. याउलट जगातील अधिक प्रभावी तंत्रज्ञ ‎‎सरकारांमधील विश्वासाचे प्रमाण बरेच जास्त आहे. ‎‎सिंगापूर आणि युएईमध्ये ते 70% पेक्षा जास्त आहे.‎चीनही या बाबतीत आघाडीवर आहे.‎ तंत्रज्ञ राजवटी सार्वजनिक चिंतांना प्रतिसाद देत‎असताना निकाल देण्यास सक्षम असतात. हे लोकशाही ‎‎सरकारांसमोरील एका गंभीर आव्हानाकडे संकेत‎करणारे आहे. त्यांच्या धोरणात तर्कशुद्धतेचा अभाव‎आहे. एकीकडे अनुभवी धोरणकर्ते आहेत. ते राजकीय‎व्यवहार्यता, सार्वजनिक भावना व पूर्वी यशस्वी‎उपाययोजनांवर आधारित धोरणे तयार करतात.‎दुसरीकडे अर्थशास्त्रज्ञ व तंत्रज्ञांचे जग आहे. कार्यक्षमता‎वाढवण्याच्या उद्देशाने धोरणे तयार करण्याचा प्रयत्न‎करतात. या दोघांत अनेकदा चुकीची जुळवाजुळव‎असते. तंत्रज्ञ यशोगाथांनी ही कोंडी टाळली आहे.‎सिंगापूर सरकार कठोर धोरण विश्लेषण करते आणि‎जनता ते कसे स्वीकारेल, हे समजून घेण्याचा प्रयत्न‎करते. त्याचप्रमाणे गल्फ कोऑपरेशन कौन्सिल‎देशांतील धोरणकर्ते नागरिकांच्या समाधानाचे मोजमाप‎करण्यासाठी तांत्रिक कौशल्य तसेच प्रणालींमध्ये मोठ्या‎प्रमाणात गुंतवणूक करतात. युएईमध्ये सार्वजनिक सेवा‎प्रदात्यांना ग्राहक समाधान अभिप्राय बूथ आहेत.‎ हे आतापर्यंत पाश्चात्य लोकशाहींसाठी कठीण सिद्ध‎झाले आहे. एक कारण म्हणजे सतत वादग्रस्त पक्षीय‎राजकारणामुळे सरकारी कामकाज कमकुवत होते. इंधन‎अनुदान काढून टाकल्याने पैसे वाचतील. असमानता‎कमी होईल असे अर्थशास्त्रज्ञांचे मत आहे, तर निवडून‎आलेल्या प्रतिनिधींना माहित आहे की अशा‎हालचालीमुळे राजकीय वादळ निर्माण होऊ शकते.‎सरकारी वित्तीय मॉडेल्स पेन्शन सुधारणांची‎आवश्यकता अधोरेखित करत असताना, जनमत‎सर्वेक्षण असे सूचित करतात की अशी धोरणे‎निवडणूकदृष्ट्या स्वतःला पराभूत करू शकतात.‎परिणामी, सरकारे तंत्रज्ञान आणि राजकारणामध्ये‎दोलायमान होतात, ज्यामुळे कामकाजात बिघाड होतो.‎एआय ही दरी भरून काढण्यास मदत करू शकते. मोठे‎भाषा मॉडेल धोरण विश्लेषणासाठी अद्वितीय क्षमता‎प्रदर्शित करतात. एआय-संवर्धित धोरण विश्लेषणाच्या‎माझ्या प्रयोगांमध्ये मला आढळले की या प्रणाली‎विशेषतः मी त्यास "भावनिकदृष्ट्या जागरूक धोरण‎डिझाइन’् म्हणतो त्या करण्यास सक्षम आहेत. पारंपारिक‎साधने दर्शवू शकतात की गर्दीचा शुल्क वाहतूक कोंडी‎22% ने कमी करते, एआय सिस्टम आपल्याला हे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎देखील आठवण करून देऊ शकतात की "कंजेशन‎चार्ज’ या शब्दापेक्षा "स्वच्छ-हवा शुल्क’ लोकांना‎चांगले मिळेल; निवडणूक वर्षात गर्दीचा शुल्क लागू‎केल्याने राजकीय धोका वाढू शकतो.‎ येथे मुद्दा मानवी निर्णयक्षमतेची जागा घेण्याचा नाही.‎अनुभवी धोरणकर्त्यांचे ज्ञान अधिक स्पष्ट, संघटित‎आणि चाचणीयोग्य बनवण्याचा आहे. एआय‎आपल्याला हे करण्यास मदत करते. शिवाय एआय टूल्स‎वेब-सर्च क्षमतांसह एकत्रित केले जातात. तेव्हा ते‎जवळपास रिअल-टाइममध्ये सार्वजनिक भावनांचे‎विश्लेषण करण्यास सक्षम होतात. हे महत्त्वाचे आहे.‎कारण मागील तिमाहीतील चिंता दूर करण्यासाठी‎डिझाइन केलेली धोरणे पुढील तिमाहीत अंमलात‎आणली जातील तेव्हा राजकीय वातावरणाशी सुसंगत‎नसतील. (@प्रोजेक्ट सिंडिकेट)‎ एआय-संचालित विश्लेषणातून बातम्या‎माध्यमे, सोशल मीडिया आणि संसदीय‎वादांत विशिष्ट मुद्द्यांबाबत कशा‎प्रकारची चर्चा होते आहे, हे समजू शकते.‎राजकीय संधीची खिडकी कधी उघडी‎आहे किंवा कधी बंद आहे हे समजू‎शकते.‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *