जीवनमार्ग:आपण मुलांना तेव्हाच वाचवू शकू जेव्हा स्वतः सावध असू

आज जगभरातील बाजारपेठा एआयमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. प्रत्येक गोष्टीचे निराकरण एआयमध्ये शोधले जात आहे. आपल्याकडे दोन स्तरांवर एआयशी जोडून काम व्हायला हवे- एक देश स्तरावर आणि दुसरे कुटुंबासाठी. एआयमुळे विकास तर व्हावा, पण या तंत्रज्ञानामुळे देशातील काम कमी होऊ नये, अन्यथा काम करणारे लोक अधिक बेरोजगार होतील. एआयवरून अमेरिका आणि चीनमध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. या दोन्ही देशांत कौटुंबिक रचना विखुरलेली आहे. एआयमुळे बाजारपेठेत आपला फायदा व्हावा असा विचार तर करायचा आहेच, पण कुटुंबाच्या सुरक्षिततेवरही चिंतन करायचे आहे. जगातील इतर देश कदाचित कुटुंब संस्थेबाबत इतके गंभीर नसतील, पण आपण हे लक्षात घ्यायला हवे की, एआयच्या विळख्यात आपला संसार येऊ नये आणि दांपत्य जीवन विखुरले जाऊ नये. आपण मुलांना एआयपासून तेव्हाच वाचवू शकू जेव्हा माता-पिता स्वतः सावध असतील. ठिणगी हाती धरून दारूच्या कोठाराचे रक्षण करता येणार नाही, हे लक्षात ठेवावे. Facebook:Pt. Vijayshankar Mehta

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *