एन. रघुरामन यांचा कॉलम:‘योग्य कृती करण्यापेक्षा’ ‘पुढे जाणे’ जास्त महत्त्वाचे झाल्यास ‌सामाजिक मूल्ये होतात नष्ट

कोणत्याही समाजाची शक्ती बहुतेकदा त्याच्या संस्थांच्या प्रामाणिकतेवर मोजली जाते - उदाहरणार्थ- शाळा. यातून आपल्या तरुणांची जडणघडण होते. दुसरे म्हणजे आपल्या परिसराचे रक्षण करणारे पोलिस. या आठवड्यात देशाच्या विविध भागातील तीन घटनांमुळे चिंताजनक स्थितीनिर्माण झाली आहे. जौनपूर आणि गोव्यात पोलिस कॉन्स्टेबलने उघडपणे चोरी केली. त्रिचीमध्ये एका पालक मुख्याध्यापकांना मारहाण करतात. हे चित्र आपण या टप्प्यावर कसे पोहोचलो असा विचार करायला लावणारे आहे. कारण कायद्याची अंमलबजावणी करणारे आणि भावी पिढीला घडवणारे दोघेही मूलभूत परीक्षेत अपयशी ठरले आहेत. त्यांच्या कथा जाणून घेऊया.... उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये गुन्हेगारांना हातकडी घालणारे हात 1.6 लाख रुपये किमतीचा नवीन आयफोनच्या मोहात जुना आयफोन बदलून देताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. कॉन्स्टेबल मिथिलेश यादव आणि धनंजय बिंद यांनी त्यांचा गणवेश सन्मानाचे प्रतीक म्हणून नव्हे तर एका किरकोळ चोरीसाठी वापरला. त्याचप्रमाणे गोव्यात कॉन्स्टेबल साईश पार्सेकर यांनी अपघातानंतर एका मरणासन्न माणसाकडून 8 लाख किमतीचे सोने चोरल्याचा आरोप आहे. हे केवळ शोषण करणारे गुन्हे नाहीत तर नैतिकतेच्या तीव्र अभावाचे सूचक आहेत. कायदा अंमलबजावणी अधिकारी एखाद्या जीवघेण्या कार अपघाताला सेवेऐवजी दरोड्याची संधी मानतो तेव्हा सामाजिक करार मोडला जातो. हे अधिकारी सक्षम होते. परंतु नैतिकदृष्ट्या कमकुवत होते. मला आश्चर्य वाटते की असे लोक सार्वजनिक सेवेत का येतात? याचे उत्तर कदाचित तामिळनाडूतील त्रिची येथील एका घटनेत आहे. के. राजा नावाच्या एका पालकाने आपल्या मुलाला ग्रुमिंग कोडचे पालन करण्यास सांगितल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकाला चापट मारली. पालक शिस्त पाळणाऱ्या शिक्षकावर हल्ला करतात तेव्हा यातून मुलाला एक धोकादायक संदेश मिळतो : नियम कमकुवत लोकांसाठी असतात. अधिकार हिंसाचाराने हाताळला पाहिजे. मुलाच्या केशरचनेवरील हा वाद प्रत्यक्षात एका मोठ्या समस्येचे छोटे स्वरूप आहे. पालक शिक्षक किंवा शिष्टाचाराचा अनादर करताना पाहून मोठे झाले तर जेव्हा ते पोलिस किंवा इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांमध्ये सामील होतात तेव्हा त्यांना असे वाटेल की त्यांच्या वैयक्तिक इच्छा कायद्याच्या वर आहेत. जौनपूर आणि गोव्यातील हवालदार एका रात्रीत भ्रष्ट झाले नाहीत. कदाचित “कठीण आणि योग्य मार्गापेक्षा’ “नैतिक शॉर्टकट’ पसंत केल्या जाणाऱ्या वातावरणात ते वाढले असतील. यावरून मला महान भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांच्या कथेची आठवण झाली. त्यांनी कौशल्यापेक्षा प्रामाणिकपणाला प्राधान्य दिले. ही कहाणी आपल्याला आधुनिक व्यवस्थेत काय उणिवा आहेत हे समजून घेण्यास मदत करते. एकदा प्रयोगशाळेतील सहायक भरती प्रक्रियेदरम्यान रमण यांनी तांत्रिक कारणांमुळे एका उमेदवाराला नाकारले. काही तासांनंतर तो तरुण सात रुपये परत करण्यासाठी कार्यालयात परतला. त्याने स्पष्ट केले की विभागाने त्याला प्रवास भत्ता देण्यात चूक केली आहे आणि तो अतिरिक्त पैसे ठेवू शकत नाही. हे पाहून रमण यांनी लगेच त्याला नोकरी देऊ केली आणि म्हणाले, मी तुला भौतिकशास्त्र शिकवू शकतो, पण प्रामाणिकपणा नाही.’ रमण यांना एक मूलभूत सत्य माहीत होते. आपल्या आधुनिक भरती व्यवस्था आणि पालकत्वप्रणाली विसरली आहे. कार्यक्षमता हे एक कौशल्य आहे. परंतु प्रामाणिकपणा हा एक मूलभूत गुण आहे. तुम्ही एखाद्याला बंदूक चालवायला शिकवू शकता किंवा समीकरणे सोडवायला शिकवू शकता, परंतु एकदा का पायाच बिघडला तर एखाद्याला चारित्र्यवान कसे बनायचे हे शिकवता येत नाही. निलंबित हवालदार आणि आक्रमक वडील एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पालक शिक्षकांच्या अधिकाराला कमी लेखत राहिले तर आपण पोलिस अधिकाऱ्यांसह व्यावसायिकांची एक पिढी निर्माण करत राहू. परंतु ते मात्र आपल्या पदांना सार्वजनिक सेवेऐवजी वैयक्तिक फायद्याचे साधन मानतात.

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *