
जोशीमठाची जमीन दिवसेंदिवस खचत चालली आहे. अशात काल रविवारी या परिसराला भूस्खलन क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. जोशीमठावर आलेलं संकट लक्षात घेता आता मोदी सरकारने यावर उपयोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. काल पंतप्रधानांच्या उपस्थितीत या संदर्भात एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत बद्रिनाथचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणाऱ्या जोशीमठाच्या भूस्खलनावर चर्चा करण्यात आली. उच्चस्तरीय बैठकीत योग्य त्या उपाययोजना तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जोशीमठात सध्या ६० घरांमध्ये भूस्खलन होऊन भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी त्यांना योग्य स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच आसपासच्या परिसरात आणखीन ९० घरे आहेत. या घरांना देखील भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याआधीच त्यांना दुसऱ्या ठिकाणी निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. आणखीन कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी प्रशासन विशेष काळजी घेत असल्याचे गढवालच्या आयुक्तांनी सांगितले आहे. येथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक पथक स्थापन करण्यात आले आहे. गुरुवारपासून या पथकाचे प्रमुख परिसरावर लक्ष ठेऊन आहेत. तसेच प्रशासनाने जागोजागी मदत केंद्रही उभारले आहेत.
जोशीमठावर तैनात केलेल्या सुरक्षा पथकाचे प्रमुख कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशीमठमध्ये सर्वच इमारतींचे सर्वेक्षण सुरू आहे. धोकादायक इमारतींचा आकडा यामध्ये वाढताना दिसत आहे. गावात एकूण ४,५०० इमारती आहेत. त्यातील ६१० इमारती धोकादायक झाल्याअसून राहण्यासाठी योग्य नाहीत. या भागात काही महावीद्यालय आणि हॉटेल्स आहेत जे सध्या तातपूरत्या राहण्यासाठी सोईचे आणि सुरक्षित आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना त्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे.
जोशीमठ गावात सुरुवातीला जमिनीला लहान भेगा पडल्या आणि नंतर त्या जास्त प्रमाणात वाढत गेल्या आहेत. घर, रस्ते आमि शेतात भेगा पडत असल्याने सर्वजण जीव मुठीत घेऊन राहत आहेत. अशात गेल्या आठवड्यात शहरात रसत्याखली असलेली जलवाहिनी फुटली होती. याने नागरिकांचे आणखीन हाल झाले. ही परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी बातचीत करत घटनेची सर्व माहिती मिळवली असल्याचे, अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच नंतर त्यांनी सर्व अधिकाऱ्यांसह उच्चस्तरीय बैठक घेतली, आणि एनडीआरएफ पथकास सुरक्षेच्या सूचना दिल्या आहेत.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




