
कार्तिकी यात्रेसाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आस घेऊन पंढरपूरकडे पायी चालत निघालेल्या वारक-यांच्या दिंडीत भरधाव वेगातील मोटार घुसल्याने घडलेल्या दुर्घटनेत मायलेकासह सात वारक-यांचा मृत्यू झाला. तर पाच वारकरी जखमी झाले. सांगोला-मिरज रस्त्यावर जुनोनी येथे सायंकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यानिमित्ताने वारक-यांच्या दिंड्यांची सुरक्षितता पुन्हा ऐरणीवर आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी व आसपासच्या गावांतील वारक-यांच्या दिंडीवर काळाने घाला घातला असून अपघातात मोटारीने दिंडीत घुसून वारक-यांना अक्षरशः चिरडत गेल्याचे दिसून आले. रंजना बळवंत जाधव (वय ५५), सुनीता सुभाष काटे (वय ५५), शांताबाई सुभाष जाधव (वय ५०), सर्जेराव श्रीपती जाधव (वय ४५), शारदा आनंदा घोडके (वय ४०, सर्व रा. जठारवाडी), सुशीला पवार (वय ३५) आणि तिचा मुलगा गौरव पवार (वय १४, रा. वळिवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) अशी या अपघातातील मृत वारक-यांची नावे आहेत. जखमींमध्ये मृत सुनीता काटे यांचे पती सुभाष केशव काटे (वय ६७) यांच्यासह अनिता गोपीनाथ जगदाळे (वय ६०), सरिता अरूण सियेकर (वय ४५), शानूबाई विलास सियेकर (वय ३५), अनिता सरदार जाधव (वय ५५) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर सांगोला ग्रामीण रूग्णालयात औषधोपचार सुरू आहेत.
सांगोल्यापासून नजीकच असलेल्या जुनोनीजवळ वारकरी दिंडी आली असताना अचानकपणे पाठीमागून भरधाव वेगाने आलेली एमएच १३ डीई ७९३८ ही मोटार कारक चालकाचा ताबा सुटल्याने दिंडीत घुसली आणि वारक-यांना अक्षरशः चिरडत गेली. तेव्हा तेथे एकच हाहाःकार माजला.मोटारचालकाचे नाव तुकाराम दामू काशीद (रा. सोनंद, ता. सांगोला) असे असून त्याच्या सोबत दिग्विजय मानसिंग सरदार (रा. पंढरपूर) हा होता. या दोघांना सांगोला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पंढरपुरात दरवर्षी आषाढी व कार्तिकीसह माघी आणि चैत्री अशा चार यात्रा होता. या यात्रांमध्ये लाखो वारकरी व भाविकांच्या दिंड्या पायी शेकडो मैल चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. परंतु एखाद दुसरा अपवाद वगळता दरवर्षी यात्रांमध्ये वारक-यांच्या दिंड्यांमध्ये मालमोटारी किंवा मोटार कार, टेम्पो घुसतात आणि त्यात निष्पाप वारक-यांचा बळी जातो. गेल्याच वर्षी सोलापूरजवळ मराठवाड्यातील वारक-यांच्या दिंडीमध्ये मालमोटार घुसली होती आणि त्यात १२ वारकरी मृत्युमुखी पडले होते. अशा जीवघेण्या घटना प्रत्येक वारीच्या वेळी घडतात. त्यामुळे वारक-यांची सुरक्षितता धोक्यात येते. अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होते. एकेका दिंडीमध्ये किमान शंभर ते सात-आठशे वारकरी असतात. सायंकाळी अंधारातही पायी चालत मार्गक्रमण केले जाते. यापूर्वी अशा दिंड्यांमध्ये वाहने घुसून झालेल्या बहुसंख्य दुर्घटना सायंकाळनंतर अंधारातच घडल्या आहेत. दिंड्यांची सुरक्षितता जपताना दिंडीप्रमुखाचीही जबाबदारी तेवढीच महत्वाची ठरते.
सायंकाळी अंधारात दिंडी थांबवावी आणि विश्रांती घेणे अपेक्षित असते. परंतु त्याकडे दुर्लक्ष होते. दिंडीच्या पुढे-मागे रस्ता सुरक्षितता म्हणून रिफ्लेक्टर लावलेले पोशाख परिधान केलेले सजग तरूण वारकरी नियुक्त करणे अपेक्षित आहे. परंतु त्याकडे सर्रास दुर्लक्ष होते. वाहतुकीची वर्दळ जास्त असलेल्या किंवा धोकादायक अपघातप्रवण भागात किमान मोठ्या दिंड्यांसाठी तरी स्थानिक पोलिसांकडून वाहतूक नियमन होणे अपेक्षित आहे. मात्र त्याबाबत बेफिकीरपणा दाखविला जातो. त्यातूनच वारकरी दिंड्यांमध्ये बाहेरची बेदरकार वाहने घुसतात आणि वारक-यांना चिरडतात. या अपघातानंतर तरी रस्ते सुरक्षिततेविषयक प्रशासनासह वारकरी दिंडीप्रमुखांनी गांभीर्य न राहिल्यास पुढील काळात आणखी वारक-यांचे हकनाक बळी जाण्याचा प्रघात सुरूच राहील. सांगोल्याजवळील या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारक-यांना वारसदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. अशी मदत आणखी कितीवेळा देण्याबरोबरच वारक-यांची सुरक्षितता जपण्यासाठी शासनाने उपाययोजना कृतीत आणावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




