
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. भारतीय जनता पार्टीनं बंडखोर आमदारांना प्रत्येकी ५० कोटी रुपये देऊन विकत घेतल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान तर ‘५० खोके, एकदम ओके’ अशा घोषणाही विरोधकांनी दिल्या होत्या.
या सर्व घडामोडीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रातील आमदारांना भाजीपाल्याप्रमाणे खरेदी केलं, हे चित्र महाराष्ट्रासाठी शरमेनं मान खाली घालायला लावणारं आहे, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. त्यांनी नुकतंच ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीच्या कार्यालयातील गणपतीचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरातही उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी संबंधित मुलाखतीतून महाराष्ट्रातील विविध राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर आपली मतं व्यक्त केली आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्यासाठी कारणीभूत असलेल्या बंडखोर आमदारांच्या चारित्र्याबाबत विचारलं असता, नाना पटोलेंनी बोचरी टीका केली आहे.
महाराष्ट्रातील आमदारांच्या चारित्र्यावर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले की, “महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधिंचं गुवाहाटीत ज्याप्रकारे दर्शन घडलं, हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालायला लावणारं आहे. महाराष्ट्रात दबाबतंत्राचा अवलंब करत लोकप्रतिनिधिंना भाजीपाल्यासारखं विकत घेण्याचं काम झालं. या प्रकाराला कुणीही माफ करणार नाही. या गोष्टीची जेवढी निंदा करू, जेवढा विरोध करू, तेवढं कमी आहे. पण जे काही झालं ते चुकीचं झालं आहे. ते महाराष्ट्राची जनता कधीही खपवून घेणार नाही. काँग्रेसकडून त्याचं कधीही समर्थन केलं जाणार नाही.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




