
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यात झालेल्या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सरशी झाली असून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाला झटका बसला आहे.
तालुक्यातील फणसोप, पोमेंडी आणि शिरगाव या तिन्ही ग्रामपंचायतींमध्ये उध्दव ठाकरे गटाचे सरपंच थेट निवडणुकीत विजयी झाले आहेत. शिरगावमध्ये शिंदे गटाचे बहुसंख्य सदस्य विजयी झाले. पण सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे या निमित्ताने ग्रामीण भागातील मूळ शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिल्याचेही अधोरेखित झाले आहे.
निवडणूक झालेल्या ३ ग्रामपंचायतींपैकी शिरगावमध्ये १७ पैकी १४ जागांवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उमेदवार विजयी झाले. तर तीन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. या ठिकाणी अटीतटीच्या लढती झाल्या. काही ठिकाणी उमेदवारांनी निसटते विजय मिळवले.
शिरगावमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून फरिदा काझी व अल्ताफ संगमेश्वरी हे विजयी झाले. सर्वसाधारण स्त्री गटातून रहिमत काझी व सना चिकटे, सर्वसाधारण गटातून शकिल मोडक, सचिन सनगरे , मयूर सांडीम, उझेर काझी, सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून शाहीन मुजावर, कांचन गोताड, अंकिता सनगरे, खुशबू काझी, स्नेहा भरणकर, जान्हवी कदम, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री गटातून मिथिला शिंदे, निरजा शेटय़े हे उमेदवार विजयी झाले.
सरपंचपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या फरिदा काझी २ हजार ६७ मते मिळवून विजयी झाल्या. अपक्ष उमेदवार श्रध्दा मोरे या १ हजार ९०२ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर, तर शिंदे गटाच्या साक्षी कुमठेकर तिसऱ्या क्रमांकावर (१७६३ मते) फेकल्या गेल्या.
फणसोप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उध्दव ठाकरे गटाच्या राधिका साळवी आणि शिंदे गटाच्या अमृता शेलार यांच्यात झालेल्या थेठ लढतीत राधिका साळवी तब्बल पावणेचारशे मतांनी विजयी झाल्या. फणसोपमध्ये राकेश साळवी, अक्षया पराग साळवी, रितेश रवींद्र साळवी, रेणुका राजेंद्र आग्रे, साक्षी चौगुले हे ५ उमेदवार विजयी झाले. यातील राकेश साळवी वगळता उर्वरित चारही विजयी उमेदवार उध्दव ठाकरे गटाचे आहेत.
पोमेंडीमध्येही महाविकास आघाडीच्या ममता जोशी यांनी शिंदे गटाच्या विधी बारगोडे यांचा पराभव केला. या ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाची युती न झाल्याने फटका बसला. कारण भाजपच्या राजश्री कांबळे यांनी सहाशेहून अधिक मते घेतली. तर सदस्यपदी गाव पॅनलचे दिगंबर मयेकर, सायली बाणे, राजेंद्र कदम, विशाल भारती, प्रांजल खानविलकर, भाजपच्या विजया कांबळे, महाविकास आघाडीच्या नलिनी कांबळे, राजेंद्र कळंबटे, रेश्मा कांबळे आणि प्राजक्ता जोशी हे उमेदवार विजयी झाले. शिंदे गटाने गाव पॅनलला पाठिंबा दिला होता.
रत्नागिरी तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी चरवेली ग्रामपंचायत बिनविरोध झाली. अन्य तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे रविवारी मतदान होऊन सोमवारी मतमोजणी पार पडली.
शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी ४ उमेदवार रिंगणात होते, तर सदस्य पदाच्या १७ जागांसाठी ४१ उमेदवारांनी निवडणूक लढवली.
फणसोप ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी २ उमेदवार रिंगणात होते, तर सदस्यपदाच्या ११ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात होते. पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये ३ उमेदवारांनी सरपंचपदासाठी अर्ज दाखल केले होते, सदस्यपदाच्या ११ जागांसाठी ३१ उमेदवारांनी निवडणूक लढवली.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


