.
मुंबई : भारताला तब्बल साडेसातहजार किलोमीटर्सचा किनारा लाभला असून; २६/११ च्या सागरी दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. खरे तर कारगिल युद्धाच्या वेळेस नेमण्यात आलेल्या समितीने सागरी सुरक्षेच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले होते. मात्र त्याकडे दुर्लक्षच झाले आणि २६/११ च्या दुर्दैवी हल्ल्याला सामोरे जाण्याची वेळ आली. त्याही पूर्वी १९९३ साली याच सागरी मार्गाने स्फोटके महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर उतरली आणि साखळी बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली…
सागरी सुरक्षेच्या मुद्दा २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मात्र देशपातळीवर गांभीर्याने घेतला गेला. सागरी सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असावी, देशाच्या किनारपट्टीवर बारकाईने लक्ष ठेवणारी साखळी रडार यंत्रणा असावी, अशा शिफारसी करण्यात आल्या आणि त्याची अमलबजावणीही हळूहळू का होईना, पार पडली. गेल्याच वर्षी या सागरी सुरक्षेच्या एकात्मिक अमलबजावणीसाठी राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयन यंत्रणा अस्तित्वात आली असून त्याचे पहिले समन्वयक म्हणून व्हाइस अॅडमिरल जी. अशोक कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय देशाच्या सागरी सुरक्षेसाठी संपूर्ण किनारपट्टीवरील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी रडार उभारण्यात आली असून एकमेकांशी जोडत त्यांची साखळी यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणांद्वारे सर्वत्र करडी नजर ठेवली जाते. शिवाय सागरी सुरक्षेमध्ये सर्व संबंधित तपास यंत्रणांचा समावेश करण्यात आला आहे. यात स्थानिक पोलीस, सीमाशुल्क अधिकारी, सीमासुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, मत्स्योत्पादन मंत्रालय, नौवहन मंत्रालय, बंदर व्यवस्थापन, तेल व नैसर्गिक वायू हाताळणी करणाऱ्या यंत्रणा याशिवाय केंद्र आणि राज्यांच्या विविध गुप्तचर यंत्रणा यांचा समावेश आहे. या सर्वांच्या एकत्रिकरणाची चाचपणी करण्यासाठी २०१९ पासून संपूर्ण देशभरात एकाच वेळेस तब्बल साडेसातहजार किलोमीटर्सच्या किनारपट्टीवर ‘सी व्हिजिल’ हे सागरी सुरक्षेचे ऑपरेशन राबविले जाते. यामध्ये पहिल्या दिवशी यंत्रणांची चाचपणी तर दुसऱ्या दिवशी घुसखोरी रोखण्याचा प्रयत्न असे ऑपरेशनचे स्वरूप असते. यात निळा गट घुसखोरी रोखण्यासाठी तर लाल गट घुसखोरी करण्यासाठी क्रियाशील असतो. तब्बल ३६ तास हे ऑपरेशन सुरू असते. अखेरीस या ऑपरेशनदरम्यान लक्षात आलेल्या त्रुटींचा अभ्यास अहवाल सादर होऊन त्यावर उपाययोजना केल्या जातात.
यंदाचे ऑपरेशन ‘सी व्हिजिल’ उद्या, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. तर १६ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता ते संपले, अशी माहिती या ऑपरेशनचे प्रमुख रिअर अॅडमिरल जनक बेवली यांनी दिली. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असून त्यासाठीचा सज्जतेचा आदेश जारी झाला आहे. निळ्या गटाचे संपूर्ण देशाचे सागरी सुरक्षा चक्र लाल गट कसे भेदणार याकडे नौदल सामरिक तज्ज्ञांबरोबरच आता संपूर्ण देशाचेही लक्ष लागून राहिले आहे.
शहर
- Marathwada Unseasonal Rain : मराठवाड्यात अवकाळी पावसाचा कहर; वीज पडून ६ जणांचा मृत्यू, १४ जनावरे दगावली
- Whatsapp : वर स्टेट्स, बाथरूममध्ये जाऊन गळा चिरला; बीडच्या तरूणानं पुण्यात आयुष्य संपवलं
- Gokhale Bridge : मुंबईकरांना खुशखबर, अंधेरीचा गोखले पूल झाला खुला, वाहतूककोंडी फुटणार
- Pune : भयावह! भरचौकात १८ वर्षाच्या तरूणीची हत्या, दुचाकीवर आले अन् सपासप वार केले
महाराष्ट्र
- 10th SSC Result : परंपरा राखली! यंदाही दहावीच्या निकालात मुलींची बाजी
- 10th SSC Result : दहावीचा निकाल जाहीर! नागपूर तळाशी, कोकणने परंपरा राखली; पाहा कुठल्या विभागाचा किती टक्के निकाल लागला
- MSRTC Recruitment : एसटी महामंडळात मेगाभरती! मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा
- 10th SSC Result : मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली, बोर्डाकडून अधिकृत घोषणा
गुन्हा
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा