महाराष्ट्र पालथा घातला असता तर…; राऊतांनी ‘सामना’त ठाकरे बंधूंचे कान टोचले

संजय राऊत यांनी सामनातील आपल्या रोखठोक सदरातून ठाकरे बंधूंच्या कार्यपद्धतीवर परखड मत व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर ठाकरे बंधूंनी महाराष्ट्र पालथा घातला असता, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते. या निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विजयाची हॅट्ट्रिक केली असून, विरोधी पक्षांना आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे राऊतांनी अधोरेखित केले.

निवडणुका लढण्याची आणि जिंकण्याची भूक राजकीय पक्षांच्या नेतृत्वात असायलाच हवी. ही भूक सध्या भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांच्या पक्षात सर्वाधिक दिसत असल्याचे राऊतांनी नमूद केले. महाराष्ट्राच्या राजकारणात तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्वच यापुढे टिकेल, असेही त्यांनी म्हटले आहे. विरोधकांनी मुंबई आणि इतर काही महापालिका वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गांभीर्याने घेतल्या नाहीत, असे या लेखात विश्लेषण केले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *