‘काजवा’ या आत्मकथनात मराठवाड्यातील आडबाजूच्या, कसल्या सोयीसुविधा नसणाऱ्या खेड्यातील उसतोड कामागारांचा मुलगा ते माध्यमिक व तांत्रिक शिक्षणाधिकारी असा लेखकाचा संघर्षमय प्रवास प्रवाहीपणे उलगडत जातो. त्यांचा हा प्रवास अर्थातच काटेरी मार्गावर चालत, अनंत अडचणींवर मात करून झाला आहे. या कथनाला कोठेही आत्मकेंद्री प्रौढीचा दर्प नाही, कसलेही कडवट मतप्रदर्शन नाही किंवा दु:खाचा बाजार मांडणे नाही. एकाच वेळी स्वीकारशील व संघर्षतत्पर आयुष्याचे हे बेमालूम मिश्रण आहे. जन्माचा दाखला नसल्याच्या कारणावरून ज्या शाळेने प्रवेश नाकारला, शिक्षणाधिकारी झाल्यावर त्याच शाळेच्या तपासणीचे काम लेखकाकडे येते व या प्रसंगातून आत्मकथनास सुरुवात होते. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना शिक्षणाचे महत्त्व ओळखून आईवडील मुलाला शाळेत दाखल करतात, परगावी ठेवतात. खस्ता खाऊन उधारउसनवाऱ्या करून, अपमान-अवहेलना सहन करून पैसे पाठवत राहतात. पिढ्यानपिढ्या ऊस तोडता तोडता, आपल्याप्रमाणेच मुलाच्याही आयुष्याचे चिपाड होऊ नये, हा यामागे विचार असतो. नात्यांतही गरीब-श्रीमंत असते, हा धडा बालवयातच लेखकाला मिळतो. परिस्थितीच्या रेट्यामुळे जगण्यासाठी लागणारी ‘सॅाफ्ट स्किल्स’(स्वयंपाक, शिवणकाम,इ.) लहान वयातच शिकणे लेखकाला भाग पडते. चुकून धक्का लागून गुंडाच्या बाटलीतील दारूची सांडलवंड झाल्याने कष्टाने कमावलेले पीठ त्याला भरून द्यावे लागते आणि त्यामुळे तिसरी-चौथी इयत्तेतील लेखकला उपाशी झोपावे लागते. हा प्रसंग अत्यंत हेलावणारा आहे. तो सहजपणे सांगितला जातो. शिक्षक - मुख्याध्यापक - उपशिक्षणाधिकारी - प्राचार्य - गटशिक्षणाधिकारी - शिक्षणाधिकारी असा लेखकाचा चढत्या क्रमाने झालेला प्रवास अनुभवसंपन्न आहे. शिक्षण घेत असतानापर्यंतचे आयुष्य अभावग्रस्ततेने व्यापले असले, तरी लेखकावर झालेल्या खोल मूल्यसंस्कारांचा पाया याच काळात पक्का झाला आहे. नोकरीच्या काळात अवडंबर न माजवता, मूल्ये जपण्याचा अट्टाहास त्याच पायावर उभा आहे. ‘खोटी कागदपत्रे दाखवून बोगस शिक्षकभरती’ची सत्यकथा वाचताना ‘निशाणी डावा अंगठा’ आठवत राहतो. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व्यवस्थेत प्रामाणिकपणाचा दिवा सांभाळण्याबाबत मराठे नावाच्या अधिकाऱ्याने लिहिलेल्या चिठ्ठीचा प्रसंग किंवा जिल्हा परिषदेतील राजकारणापायी भ्रष्टाचाराच्या खोट्या आरोपांमध्ये गोवण्याचा प्रयत्न - या घटनांमधून लेखकाच्या सचोटीवर शिक्कामोर्तब होते. सडलेल्या व्यवस्थेवर अंत:स्थ व्यक्तीकडून सूक्ष्मपणे केले जाणारे भाष्य वर्मावर अचूक बोट ठेवणारे आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणारे प्रयोगशील अभिनव उपक्रम सातत्याने राबवत राहणे, हे लेखकाच्या कारकिर्दीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. ते लेखकाच्या समाजाभिमुख वैचारिक प्रगल्भतेचे लक्षण आहे. वेगवेगळ्या गावांत लेखकाच्या संकल्पनेतून राबवल्या गेलेल्या ‘बिनपैशाचा उपक्रम’, ‘कृतियुक्त अध्ययन’, ‘शाळाबाह्य मुलींचे शिक्षण’, ‘शाळा तिथे संगणक’, ‘विद्यार्थी अपघात विमा’, ‘चावडीवाचन’, ‘निसर्गशाळा’, ‘गुणवत्ता विकास कार्यक्रम’ अशा अनेक उपक्रमांतून विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय रितीने वाढली, तसेच शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी मदत झाली. अनेकदा अल्पवयीन मुलामुलींच्या लग्नासाठी सामाजिक, आर्थिक कारणांसाठी कित्येकदा पालकांकडून दबाव आणला जातो. त्यामुळे अनेक मुलांचे शिक्षण कायमचे बंद होते. या बहुपदरी समस्येचे निराकरण करणेही लेखकाला आवश्यक वाटते. लेखकाची ‘माणूस’ म्हणून झालेली जडणघडण दर्शवणारे अनेक प्रसंग पुस्तकात येतात. साठवलेल्या पैशांची रूम पार्टनर चोरी करतो, पण ते पैसे त्याला सैन्यात भरती होण्यासाठी उपयोगी पडल्याचे कळल्यावर लेखकाची तगमग शांतावते. लग्नानंतर एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या लेखकाची एकंदर परिस्थिती पाहून सुरुवातीला सासरच्या मंडळींना काही शंका असणे स्वाभाविक होते. त्यावेळी त्यांचे मेहुणे शहाजी यांचा लेखकाला पाठिंबा होता. लेखकाचे बंधूही न्यायाधीशपदावर विराजमान झाले. वयोवृद्ध पित्याला स्वप्नातील विमान प्रवास घडवताना आणि हवाईसुंदरीच्या हातचा ‘पाणी फुळूक’ चहा पाजतानाचा प्रसंग एकाचवेळी गमतीशीर आणि हृदयस्पर्शी झाला आहे. माणसं कशीही असली, तरी शेवटी त्यांच्या चांगुलपणावर लेखकाचा विश्वास आहे. ‘थोडा है थोडे की जरूरत है, जिंदगी फिरभी यहा, खूबसूरत है’ यावर लेखकाचा गाढ विश्वास आहे. गुरुवर्य एल. के. कुलकर्णींच्या काव्यपक्तींमध्ये लेखकाच्या आत्मकथनाचे सार सामावले आहे... ‘कबूल आम्ही असू काजवे, प्रकाश इवला आमचे भूषण उधार घेऊन प्रकाश कृत्रिम मग चमचमणे कधी न जमले शिड्या भिकेच्या हातात घेऊन वरती चढणे कधी न जमले’ काजवा स्वयंप्रकाशित असतो आणि अंधाऱ्या रात्री स्वतःच्या प्रकाशात वाट शोधतो. त्याचा प्रकाश डोळे दिपवून टाकणारा लखलखीत नसला, तरी इतरांनाही वाट दाखवणारा आश्वासक दिलासा त्यात नक्कीच असतो. निराशेच्या अंधारवाण्या रात्री उजळून टाकण्यासाठी लेखकासारख्या काजव्यांचे थवे निरंतर कार्यरत असतात - स्वतःला आणि कळतनकळत समाजाला वाट दाखवण्यासाठी. पुस्तकाचे नावः काजवा
लेखकः पोपट श्रीराम काळे
प्रकाशकः मनोविकास प्रकाशन
मूल्यः ₹ ३५०/-
पृष्ठसंख्याः २७२
प्रथम आवृत्तीः १८ जून २०२२ संबंधित वृत्त बुक रिव्ह्यू:'पुस्तके साद आणि दाद'मध्ये मुखापासून उगमाकडे जाणारा प्रवास; मूळ साहित्यकृती वाचायला येतो हुरूप! 'वसुंधरेचे शोधयात्री':साहसी दर्यावर्दींचा चित्तथरारक इतिहास मांडणारे लेखक डॉ. अनुराग लव्हेकर यांची मुलाखत, ऐका आणि पाहा VIDEO https://link.divyamarathi.com/lHdELfz6JPb
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


