
पुणे : दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाळी स्थिती निर्माण होत असतानाच महाराष्ट्रातील रात्रीच्या किमान तापमानात अचानक मोठी वाढ होऊन थंडी गायब झाली आहे. किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंशांनी वाढले आहे. दिवसा निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे उन्हाच्या चटक्यातही वाढ झाली आहे. तापमानवाढीची ही स्थिती रब्बीच्या पिकांसाठी पोषक नाही आणि सातत्याने बदलणारे वातावरण आरोग्याच्या दृष्टीनेही अनुकूल नसल्याचे मत अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहे. पुढील सुमारे आठवडाभर तापमानातील वाढ कायम राहून, राज्यात काही भागांत ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र तापमानात घट होणार आहे.
नोव्हेंबर महिन्यामध्येही तापमानात सातत्याने चढ-उतार झाले. मात्र, या महिन्यात पंधरवाड्यानंतर काही काळ चांगली थंडी अनुभवता आली. अनेक भागांतील तापमान हंगामातील नीचांकी पातळीपर्यंत खाली आले होते. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भाग आणि कोकणात काही भागांत कडाक्याची थंडी होती. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे ही थंडी होती. त्यातून रब्बी हंगामातील पिकांना लाभ झाल्याचे शेती अभ्यासकांकडून सांगण्यात आले. नागरिकांनाही काही काळ गुलाबी थंडीची अनुभूती आली. मात्र, त्यानंतर उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आणि दक्षिणेकडील बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव निर्माण झाल्याने थंडी गायब झाली.
भारतीय हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार डिसेंबर महिन्यात संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी असणार आहे. मात्र, महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानवाढ झाली. त्यामुळे महिन्याचा पहिला आठवडा थंडीविना जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या राज्यात कोणत्याही ठिकाणी रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या खाली नाही. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सरासरीपेक्षा २ ते ६ अंश खाली गेलेले तापमान सध्या तितकेच सरासरीच्या तुलनेत वाढले आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तापमान सरासरीपेक्षा तब्बल ३ ते ७ अंशांनी वाढले आहे. विदर्भात १ ते ३ अंशांनी वाढ झाली आहे. मुंबईसह कोकणात सर्वत्र किमान तापमानात २ ते ३ अंशांची वाढ आहे. दिवसाच्या कमाल तापमानाचा पाराही सरासरीपुढे आहे. महाबळेश्वर वगळता सर्वत्र दिवसाचे तापमान ३० ते ३४ अंशांच्या आसपास आहे.
तापमानवाढ कशामुळे?
उत्तरेकडील राज्यांत सध्या थंडीचे प्रमाण कमी आहे. त्यातच आता बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती सुरू झाली आहे. या भागातून उत्तरेकडे वारे वाहत आहेत. काही भागांत अंशत: ढगाळ वातावरण तयार होत आहे. परिणामी महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव कमी होऊन तापमानात वाढ झाली आहे. ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि दक्षिणेकडील इतर काही भागांत पावसाची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काही भागांत ढगाळ स्थिती राहील. परिणामी आठवडाभर तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
महाराष्ट्र
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
गुन्हा
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
























Subscribe to my channel


