म्हात्रे पूल डीपी रस्त्यावरील अतिक्रमणे काही तासांमध्ये साफ केल्यानंतर शहराला अनधिकृत बांधकामांनी किती विळखा घातला आहे, हे लक्षात आले. मुळात अशी बांधकामे करून तेथे राजरोस व्यवसाय करण्याचे धाडस कोणामुळे येते, अशा बांधकामांवर वेळीच कारवाई का होत नाही, हा खरा प्रश्न आहे.
प्रशासक राज असेल तर संबंधित प्रशासक लोकप्रतिनिधी असताना जी कामे करणे शक्य होत नाहीत, अशा कामांवर भर देतात. पुणे महापालिकेचे आयुक्त व प्रशासक असणाऱ्या विक्रम कुमार यांनीही हीच संधी साधत शहरात मोठ्याप्रमाणावर वाढलेल्या अतिक्रमणांवर कारवाईचा निर्णय घेतला. तत्कालीन महापालिका आयुक्त अरुण भाटिया यांच्यानंतर प्रथमच शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे काढण्याची कारवाई होत आहे.
दुकानदारांनी आपल्या समोरच्या जागा लाटल्या. हॉटेल व्यावसायिकांनी पार्किंगच्या जागांमध्ये व्यवसाय सुरू केला. काही नगरसेवक, अधिकाऱ्यांनी हॉटेल, मंगल कार्यालये, लॉन्स, टेरेस गार्डन अशी वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमणे केली. ती काढण्याची हिंमत प्रशासनाने दाखवली नाही. त्यामुळेच आज अनधिकृत बांधकाम वा अतिक्रमण करणाऱ्यांना धाक उरला नाही. हीच परिस्थिती म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यानच्या अतिक्रमणांबाबत झाली. नदीपात्रात भराव टाकून येथे हॉटेल, लॉन्स उभारली. अगदी अलीकडच्या पाच वर्षांत हा रस्ता गजबजला. खरंतर २०१६ मध्येच हरित न्यायाधिकरणाने नदीपात्रातील ब्ल्यू लाईनमधील तसेच ग्रीन बेल्टमधील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले होते. पण काही नगरसेवकांचीच हॉटेल या भागात असल्याने कारवाई झाली नाही. महापालिकेला ही अतिक्रमणे माहिती असताना त्यांनी येथे पिण्याचे पाणी, ड्रेनेज व्यवस्था पुरवली.
पालिकेच्या आरोग्य विभागाने हॉटेलला आवश्यक परवानग्या दिल्या. मग अतिक्रमण करणारा एकटाच जबाबदार कसा. महापालिका अधिनियमात सुधारणा करून अतिक्रमण होत असल्यास त्यास क्षेत्रीय कार्यालयातील कोणते अधिकारी जबाबदार आहेत, पोलिसांची जबाबदारी काय असेल हे निश्चित केले आहे. पण ही जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कधीच कारवाई होत नाही. उलट अशा मालकांकडून नियमित हप्ते वसूल केले जातात. सर्वसामान्य नागरिकाने त्याच्या फ्लॅटमधील गॅलरी जरी बंद केली तर कार्यक्षम अधिकारी कारवाई करतात, मग मोठी अतिक्रमणे वाढतातच कशी, हा प्रश्न आहे. शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर राजकीय कार्यकर्ते, संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची अतिक्रमणे दिसतात. या जागेत स्वतःची कार्यालये थाटली आहेत. ही अतिक्रमणे प्रशासकांनी काढायला हवीत. नगरसेवकांनाच हात घातला तर त्यांच्या नावाखाली होणारी अतिक्रमणे रोखता येतील. याशिवाय गेल्या वर्षभरात भर रस्त्यावर अनेक मंदिरे उभी राहिली आहेत.
अशी धार्मिक अतिक्रमणेही सामाजिक तेढ निर्माण होण्यापूर्वी काढायला हवीत. शिवाजी रस्त्यावर एका मंदिराचे अतिक्रमण रस्त्यावर आले आहे, नागरिकांना दिसणारी ही अतिक्रमणे प्रशासनाला का दिसत नाहीत. जर अतिक्रमण होताच ती हटविण्याची यंत्रणा कार्यान्वित झाली, दबाव आणणाऱ्या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द झाले तर अतिक्रमण करण्यास कोणी धजावणार नाही आणि मोठी कारवाई करण्याचीही गरज भासणार नाही.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


