डॉ. राम चरण यांचा कॉलम:आत्मविश्वास महत्त्वाचा; पण‎त्यालाही ‘रिन्यू’ करावे लागते‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎जगभरात सहा दशकांपासून सीईओ आणि संचालक ‎मंडळांना सल्ला देताना मी एक गोष्ट सातत्याने पाहिली‎आहे. ही बाब ग्रेट लीडर्सना गुड लीडर्सपासून वेगळे‎करते. ती बुद्धिमत्ता नाही. रणनीती नाही. केवळ‎अनुभवही नाही. ती म्हणजे- आत्मविश्वास. अहंकार‎नाही. ते दिखाऊ धाडसही नसते. तो असतो‎ आत्मविश्वास.‎ आत्मविश्वास ही आपल्या ‘बीइंग’ची एक अवस्था‎आहे. तो आपल्या क्षमतांची सखोल जाणीव व आपण‎काम करत असलेल्या वातावरणाबद्दलची स्पष्ट ओळख‎यांतून निर्माण करून देणारा असतो. स्वतःच्या शक्तीची‎स्पष्ट जाणीव आणि मर्यादा प्रामाणिकपणे स्वीकारल्याने‎विश्वास निर्माण होतो, तोच आत्मविश्वास असतो.‎सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या मर्यादा तुमच्या‎वाटेतील अडथळा बनू नयेत. त्यांनी तुम्हाला पुढे‎जाण्यास प्रेरित केले पाहिजे. अनेक लीडर्स‎आत्मविश्वास म्हणजे निश्चितता असे मानण्याची चूक ‎‎करतात. पण या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. निश्चितता ‎‎म्हणते : मला नेमके काय होणार आहे हे माहिती आहे. ‎‎आत्मविश्वास म्हणतो : नेमके काय होणार आहे हे‎माहिती नाही, पण त्याचा सामना करण्याची आणि‎परिस्थिती हाताळण्याची क्षमता माझ्यात आहे, यावर‎माझा विश्वास आहे. आजच्या जगात हा फरक अत्यंत‎महत्त्वाचा आहे.‎ खरा आत्मविश्वास घडवणाऱ्या तीन गोष्टी आहेत.‎पहिली म्हणजे ज्ञान आणि कौशल्य. तुम्हाला तुमच्या‎क्षेत्राची सखोल आणि स्पष्ट समज असते, तेव्हा‎आत्मविश्वास दाखवण्याची गरज राहत नाही. तो‎आपोआप दिसून येतो. तयारी ही आत्मविश्वासाची‎पायाभरणी असते. मनापासून मेहनत घेतली आहे, त्याला‎दिखावा करण्याची गरज भासत नाही.‎ दुसरी गोष्ट म्हणजे अनुभव आणि त्यातून मिळालेली‎शिकवण. प्रत्येक आव्हान, प्रत्येक धक्का आणि‎तणावात घेतलेला प्रत्येक निर्णय तुमची पायाभरणी‎अधिक मजबूत करतो. ज्याने संकटांचा सामना करून‎त्यातून मार्ग काढला आहे, त्याचा आत्मविश्वास हा‎फक्त सोप्या परिस्थिती पाहिलेल्या व्यक्तीपेक्षा पूर्णपणे‎वेगळा असतो. तुमचे कठीण क्षण वाया जाऊ देऊ नका.‎त्यातून शिकण्यासारखे काहीतरी जरूर घ्या. तिसरी गोष्ट‎म्हणजे आत्मजाणीव. तुम्ही कोणत्या गोष्टीत चांगले‎आहात, हे जाणून घ्या. तसेच कोणत्या क्षेत्रांत तुम्हाला‎इतरांची गरज आहे, हेही समजून घ्या. स्वतःमध्ये‎कोणतीही कमजोरी नाही, असा दिखावा करणारा लीडर‎इतरांना फसवू शकत नाही आणि स्वतःही काही शिकू‎शकत नाही. स्वतःच्या ताकदी आणि मर्यादा स्पष्टपणे‎ओळखणाऱ्या लीडरचाच आत्मविश्वास सर्वाधिक‎टिकाऊ असतो. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा :‎आत्मविश्वास स्थिर नसून गतिशील असतो. हीच गोष्ट‎आहे. अनेकांना समजत नाही. आत्मविश्वास ही अशी‎गोष्ट नाही की एकदा मिळवली आणि कायम स्वतःकडे‎ठेवली. तो सतत बदलत राहतो. तो तुमच्यासोबत‎विकसित होत राहायला हवा. जग वेगाने बदलत आहे.‎त्याचे उदाहरण इतिहासात मिळत नाही. नवीन तंत्रज्ञान,‎नवीन भू-राजकीय वास्तव आणि नवीन व्यावसायिक‎मॉडेल्स सतत समोर येत आहेत. आजच्या‎आत्मविश्वासी लीडरने कालचे काम विसरण्यास,‎आजचे सत्य स्वीकारण्यास आणि उद्याच्या गरजांसाठी‎स्वतःला तयार ठेवण्यास सक्षम असले पाहिजे.‎ याचा अर्थ असा की आत्मविश्वास सतत ‘रिन्यू’ करावा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎लागतो- सातत्याने शिकत राहून, प्रामाणिक‎आत्मपरीक्षण करून आणि ‘मी चुकीचा होतो, आता‎मला ते समजले आहे’ असे सांगण्याचे धैर्य ठेवून.‎एखादा लीडर खऱ्या आत्मविश्वासाने एखाद्या खोलीत‎प्रवेश करतो. तेव्हा काहीतरी बदलते. टीमलाही ते‎जाणवते. निर्णय अधिक स्पष्ट होतात. जोखीम‎हाताळण्याजोगी वाटू लागते. इनोव्हेशन शक्य होते.‎आत्मविश्वासी लीडर इतरांचा आत्मविश्वास कमी‎करत नाही; तो वाढवतो.‎ दररोज संध्याकाळी स्वतःला तीन प्रश्न विचारा. आज मी‎काय चांगले केले? आज मी काय शिकलो? आणि मी‎कोणती गोष्ट वेगळ्या पद्धतीने करू शकलो असतो? ही‎साधी सवय सातत्याने अंगीकारली, तर ती खरी‎आत्मजाणीव निर्माण करते, जी खऱ्या आत्मविश्वासाचा‎पाया असते. यात काही नाट्यमय किंवा गुंतागुंतीचे नाही.‎पण प्रामाणिकपणे आणि सातत्याने हे केल्यास, तुम्ही‎स्वतःकडे पाहण्याची आणि इतरांनी तुमच्याकडे‎पाहण्याची दृष्टी बदलू शकते.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ आत्मविश्वास स्थिर नसतो, तर तो‎गतिशील असतो. ही गोष्ट अनेकांना‎समजत नाही. एकदा मिळवला की‎कायम टिकणारी गोष्ट आत्मविश्वास‎नाही. तो तुमच्यासोबत सतत विकसित‎होत राहिला पाहिजे.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

इतर

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *