Pakistan BLA Clash : पाकिस्तानात नेमहीच काहीतरी घडत असतं. या देशात कधी बॉम्बस्फोट होतो. तर कधी अजब फतवा निघतो. गेल्या काही दिवसांपासून तिथे पाकिस्तानी लष्कर आणि बलुच लिबरेशन आर्मी अर्थात बीएलए यांच्यात मोठा संघर्ष सुरू आहे. बीएलएने पाकिस्तानात काही ठिकाणांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानी लष्करानेही बीएलएच्या तळांना लक्ष्य केले. दरम्यान, आता याच संघर्षाबाबत मोठी आणि हादरवणारी माहिती समोर येत आहे. येथे बीएलएने आम्ही एकूण 17 पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. बीएलएच्या या कारवाईमुळे पाकिस्तानी लष्कराची झोप उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार बीएलएने एकूण 17 पाकिस्तानी सैनिकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना बंदी बनवलं आहे. तसा दवाच बीएलएने केले आहे. यापैकी एकूण 10 सैनिकांना बीएलने सोडले असून अजूनही सात सैनिक त्यांच्याच ताब्यात आहेत. सोबतच या बंदी बनवलेल्या सैनिकांची सुटका हवी असेल तर पाकिस्तानी सरकारकडे बीएलएने मोठी मागणी केली आहे. बलुच भागातील बंदी केलेल्या लोकांची जोपर्यंत पाकिस्तानी सरकार, लष्कर जोपर्यंत सुटका करत नाही तोपर्यंत आम्हीदेखील 17 पाकिस्तानी सैनिकांची सुटका करणार नाही, अशी भूमिका बीएलएने घेतली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानात सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
बीएलएच्या मीडिया विभागाचे प्रवक्ते जीयंड बलोच यांनी याबाबत बीएलएची भूमिका स्पष्ट केली आहे. बीएलएची ही कृती ऑपरेशन हिरोफचा दुसरा भाग आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
उरलेल्या 7 सैनिकांवर नेमके आरोप काय?
जीयंड बलोच यांनी सांगितल्यानुसार 17 पैकी 10 पाकिस्तांनी सैनिकांना सोडून देण्यात आलं आहे. सोडून दिलेले 10 सैनिक हे बलुच प्रांतातील स्थानिक पोलीस संघटनांशी संबंधित होते. उर्वरीत 7 सैनिक हे पाकिस्तानी लष्कराशी संबंधित आहेत. बंदी म्हणून ठेवण्यात आलेल्या या सात सैनिकांविषयी बलुच नॅशनल कोर्टात सुनावणी झाली आहे. बीएलएच्या ताब्यात असलेल्या सैनिकांकडून बलुच येथील लोकांना त्रास दिला जातो, असा आरोप करण्यात आला आहे. एवढंच नाही तर बंदी बनवलेल्या सैनिकांवर नरसंहाराचाही आरोप आहे.
पाकिस्तान नेमकी काय भूमिका घेणार?
दरम्यान, आता बीएलएने पाकिस्तानी लष्करातील सैनिकांनाच बंदी बनवल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी सरकार किंवा पाकिस्तानी लष्कराने यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे भविष्यात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




