राजस्थानमध्ये शनिवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. जयपूरच्या चाकसू परिसरातील या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. कोटा-जयपूर राष्ट्रीय महामार्ग-52 वरील तिग्रिया वळणाजवळ पहाटे 5:30 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेतील मृत प्रवासी हे मध्य प्रदेशातील जबलपूरचे रहिवासी होते आणि ते धार्मिक यात्रेला गेले होते अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
5 जणांचा मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार, या भाविकांनी उज्जैनमधील महाकालेश्वर महादेवाचे दर्शन घेतले आणि नंतर ते खाटूश्यामजी येथे जात होती. त्यावेळी चालकाला झोप लागली आणि कार समोर जात असलेल्या ट्रेलरला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की कार पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. या अपघातात एका महिलेसह 5 जणांचा मृत्यू झाला. यातील 4 जण जागीच मरण पावले होते, तर एका तरुणाला गंभीर दुखापत झाली होती. त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच मरण पावला. रेश्मा श्रीवास्तव, पियुष राय, राहुल रजक, शानू आणि चालक अनुराग अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.
वाहतूक विस्कळीत
या अपघातामुळे कोटा-जयपूर राष्ट्रीय महामार्ग-52 वरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि वाहतूक पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि क्रेनच्या मदतीने खराब झालेली कार रस्त्यावरून दूर केली. त्यानंतर काही वेळानंतर वाहतूक पूर्ववत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
ते दोन दिवसांपूर्वी दर्शनासाठी निघाले होते
पोलिसांनी या अपघाताबाबत बोलताना सांगितले की, अपघातातील सर्व मृत लोक दोन दिवसांपूर्वी देवदर्शनासाठी उज्जैनला निघाले होते. त्यांनी 13 फेब्रुवारी रोजी महाकालचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ते खाटूश्यामजीकडे निघाले होते. मात्र वाटेत हा दुर्दैवी अपघात झाला आणि यात सर्वांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघातातील मृतांचे मृतदेह चाक्सू उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात हा अपघात चालकाला झोप लागल्याने घडल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता पोलिसांनी कसून तपासाला सुरूवात केली आहे. या अपघातासाठी इतर काही कारण आहे का हे पोलीसांकडून तपासले जात आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




