अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सतत होणाऱ्यागदारोळात संसदेची गौरवशाली परंपरा खंडित होतअसल्याचे पाहणे लोकशाही व्यवस्थेवर विश्वासठेवणाऱ्यांसाठी खूप वेदनादायक आहे. राष्ट्रपतींच्याअभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर नरेंद्र मोदी यांनाबोलू दिले गेले नाही. परंतु असे पहिल्यांदाच घडलेलेनाही. २००४ मध्ये मनमोहन सिंग यांनाही ही संधीनाकारली गेली होती. परंतु यावेळी एक नवीन उदाहरणमांडण्यात आले. प्रस्ताव मतदानासाठी ठेवण्यात आलातेव्हा पंतप्रधान स्वतः लोकसभेत उपस्थित नव्हते. विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आभारप्रस्तावावरील चर्चा रद्द झाली असेल तर अर्थसंकल्पीय चर्चाही गदारोळात वाहून गेली. संसदेच्या तीन वार्षिक अधिवेशनांपैकी सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अपेक्षित गांभीर्यआणण्याच्या तडजोडीत सत्ताधारी भाजप किंवाकाँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष रस दाखवतनाहीत. खरे तर सभागृहात व्यत्यय आणि वारंवारतहकुबी भाजपसाठी फायदेशीर आहे. कारण ते अस्वस्थ प्रश्न टाळण्याची सोयीस्कर संधी मिळते. दुसरीकडेविरोधी पक्षांनी - विशेषतः काँग्रेसने - संसदेत गंभीरआणि तर्कशुद्ध चर्चेपेक्षा त्यांचा गदारोळ वचिथावणीखोर घोषणाबाजी जनतेपर्यंत अधिकप्रभावीपणे पोहोचते, असा असा निष्कर्ष काढला आहे.काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळातअरुण जेटली राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तेव्हात्यांनी जाहीरपणे म्हटले होते की संसदेत व्यत्यय आणणेहे लोकशाहीचे उल्लंघन नाही. एका वर्षानंतरलोकसभेतील त्यांच्या समकक्ष सुषमा स्वराज यांनीहीहेच मत मांडले. 2012 मध्ये त्या म्हणाल्या, संसदेचेकामकाज होऊ न देणे हे देखील लोकशाहीचे एक रूपआहे. अलिकडच्या संसदीय इतिहासावरून असे दिसूनयेते की विरोधी पक्षातील राजकीय पक्षांमध्ये ही धारणारूढी झाली आहे. 1995 मध्ये भाजप विरोधी पक्षात होता.तेव्हा त्यांनी नरसिंह राव सरकारमधील दूरसंचार मंत्रीसुखराम यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून संपूर्णहिवाळी अधिवेशन थांबवले होते. 2001 मध्येवाजपेयींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या काळातकाँग्रेसने तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचाबहिष्कार टाकला होता. तेहलका टेप्स घोटाळ्यातफर्नांडिस यांचे नाव समोर आले होते. फर्नांडिस यांनासंसदेत बोलण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेस खासदारांनीगोंधळ घातला. फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखालीलसंसदीय स्थायी समित्यांच्या बैठकांना उपस्थितराहण्यासही त्यांनी नकार दिला होता. 2010 मध्येमनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारलाहादरवून टाकणाऱ्या 2-जी घोटाळ्याची चौकशीसाठीजेपीसी स्थापन करण्याच्या भाजपच्या मागणीने तेहिवाळी अधिवेशन व्यर्थ गेले होते. अशा व्यत्ययांसाठी विरोधी पक्षांना जबाबदार धरले जातअसले तरी संसदेचे कामकाज सुरळीत चालावे याचीजबाबदारी सरकारची आहे हे देखील खरे आहे-त्यासाठी विरोधकांशी तडजोड करण्यात एक पाऊलमागे घ्यावे लागले तरी सरकारने ते करावे. फर्नांडिसयांचा बहिष्कार दीड वर्ष चालला तेव्हा वाजपेयीसरकारने अखेर माघार घेऊन चर्चेसाठी सहमतीदर्शविली होती. त्यानंतर दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष -राज्यसभेत भैरवसिंग शेखावत आणि लोकसभेत मनोहरजोशी - यांनी पुढाकार घेतला. दोन्ही पक्षांनावाटाघाटीच्या टेबलावर बोलावले आणि संवादाचे सूत्रतयार करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे 2-जीघोटाळ्याच्या जेपीसी चौकशीच्या भाजपच्या मागणीवरसंपूर्ण हिवाळी अधिवेशनात ठाम राहिल्यानंतर मनमोहनसिंग सरकारने शेवटी हार मानण्याचा निर्णय घेतलाहोता. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळित चालावे अशीत्यांची इच्छा होती. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे) तीव्र ध्रुवीकरणाच्या या युगात -राजकीय गटांमधील दरी अधिकचवाढली आहे - संसदेची प्रतिष्ठाजपण्यासाठी संयम, धैर्य आणितडजोडीसाठी एक पाऊल मागे घेण्याचीतयारी आता पूर्वीपेक्षा जास्त गरजेचीबनली आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

