“छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने पुरंदर येथे जो विमानतळ होणार आहे, त्याच्या भूमी अधिग्रहणाला मान्यता दिली आहे. निधी उभारण्याकरता मान्यता दिलेली आहे. या संदर्भातली प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे. 96 टक्के लोकांनी मान्यता दिलेली आहे. लवकर जमीन अधिग्रहण केलं जाईल. साधारणापणे 1 जूनपर्यंत हे भूमिअधिग्रहण करावं असा आमचा प्रयत्न आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “एमएमआरडीएला अटल सेतूच्या जवळ प्लानिंग ऑथोरिटी म्हणून जी काही जागा आपण दिलेली आहे. त्या ठिकाणी सिडको आणि एमआयडीसीचे नियम लागू करुन त्यांना जमीन अधिग्रहण करता येईल अशी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे तिसऱ्या मुंबईची आपली जी संकल्पना आहे, त्या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, वेगाने काम करता येईल” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
“आज जलसंपदा विभागाचा महत्वाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्या ठिकाणी 40 प्रकल्प आणि 100 कनॉल 15 हजार कोटी रुपये नाबार्डच्या माध्यमातून दीर्घ मुदतीचं कर्ज घेण्यासाठी मान्यता दिलेली आहे. जे प्रकल्प घेतले आहेत, ते पुढच्या एक-दोन वर्षात पूर्ण होऊ शकतात. अंतिम टप्प्याचं काम बाकी आहे. हे जे काही प्रकल्प पूर्ण करणार आहोत, त्यामुळे साडेतीन लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. एकूण आठ लाख एकर जमीन ओलिताखाली येईल अशा प्रकल्पाला मान्यता दिली आहे. सगळ्या रीजनला याचा फायदा होईल. सगळे अपूर्ण प्रकल्प यात घेतले आहेत” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
रोज उगाच पतंग कशाला उडवायचे
“आज सुनेत्राताई पवार यांची पहिली मंत्रिमंडळ बैठक होती. दुखवटा असल्याकारणाने आम्ही फक्त शब्दसुमनाने त्यांचं स्वागत केलं. त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगली वाटचाल करेल. कालच्या निवडणुकीत त्यांचा चांगला परफॉर्मन्स राहिला” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, “विलिनीकरणाचा विषय हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. मी त्यात बोलणं योग्य राहणार नाही. जेव्हा वेळ येईल. ते अधिकृतरित्या सांगितल, त्यांच्यात काही ठरलं तर मी प्रतिक्रिया देईल. रोज उगाच पतंग कशाला उडवायचे”
म्हणून त्यांना वाईट वाटतय
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमावर राज ठाकरे यांनी टीका केली. त्यावर सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं. “ज्या लोकांना निमंत्रण मिळालं नाही म्हणून त्यांना वाईट वाटतय. म्हणून ज्यांना निमंत्रण मिळालं त्यांच्यावर ते टीक करतायत. संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली. संघासंदर्भात वाद, अपवाद किंवा स्पष्ट माहिती मिळावी. लोकांच्या मनातले प्रश्न दूर व्हावेत यासाठी समाजातल्या विविध क्षेत्रातले, विविध उद्योगातल्या लोकांना बोलावलेलं”
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

