"Mamata Banerjee Never Lost in Bengal": Sanjay Raut Accuses Center of ‘Terrorizing’ Opposition; Fires Salvos at Nitish Kumar

संजय राऊत म्हणजे काँग्रेसने पाळलेलं 'पिल्लू'; नवनाथ बन यांचा घणाघात, उद्धव ठाकरेंनाही दिला आंदोलनाचा खोचक सल्ला

"Mamata Banerjee Never Lost in Bengal": Sanjay Raut Accuses Center of ‘Terrorizing’ Opposition; Fires Salvos at Nitish Kumarमुंबई: पश्चिम बंगालमधील निवडणूक निकाल आणि राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना (उबाठा) गटावर बोचरी टीका केली आहे. "संजय राऊत हे आपल्या सहकाऱ्यांना गिळणाऱ्या काँग्रेस नावाच्या 'अजगर'चे पिल्लू आहेत," असा टोला लगावत त्यांनी उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंनी कोलकातामध्ये जाऊन आंदोलन करावं
ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ उभ्या ठाकलेल्या उद्धव ठाकरेंना नवनाथ बन यांनी खोचक सल्ला दिला आहे. "उद्धव ठाकरेंना मातोश्रीबाहेर पडावसं वाटत नाही, पण आता त्यांनी थेट कोलकाता गाठावे आणि ममता बॅनर्जी यांच्या घरात बसून वर्षभर आंदोलन करावे. सत्तेसाठी हपापलेल्या संजय राऊतांनी आपल्या पक्षाच्या आमदारांकडे लक्ष देण्याऐवजी दुसऱ्यांच्या राज्यात लुडबुड थांबवावी. एकनाथ शिंदे गेल्यानंतर तुम्हाला जाग येते, यातच सर्व काही समजते," अशी टीका बन यांनी केली.

काँग्रेस म्हणजे सहकाऱ्यांना गिळणारा अजगर
पश्चिम बंगालमध्ये 'इंडिया' आघाडीचे अस्तित्वच नव्हते, असा दावा करत बन म्हणाले की, "ही ध्येयधोरण नसलेली आघाडी आहे. काँग्रेस हा आपल्या सहकाऱ्यांना गिळणारा अजगर आहे. ज्या ज्या पक्षांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली, त्यांचे अस्तित्व संपवण्याचे काम काँग्रेसने केले आहे. संजय राऊत केवळ स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी काँग्रेसची सुपारी घेऊन काम करत आहेत."

​जरांगेंच्या सल्लागारांनी अर्धवट माहिती देऊ नये
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विधानांवर भाष्य करताना बन म्हणाले की, "जरांगे यांच्या सल्लागारांनी त्यांना चुकीची माहिती देऊ नये. भाजपने यापूर्वीही ममता बॅनर्जींचा पराभव केला आहे. जरांगे पाटलांनी बंगालमध्ये जाऊन बॅनर्जींची दहशत पाहावी, मगच भाष्य करावे. फडणवीस हे कायद्याने चालणारे नेते आहेत. नसरापूर येथील चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फासावर चढवण्याचे काम हे सरकारच करेल, त्यामुळे या संवेदनशील विषयात कोणीही राजकारण करू नये."

​उबाठाचा 'दिवा' आता विझणार
संजय राऊत यांच्या विधानाचा समाचार घेताना नवनाथ बन म्हणाले की, "दिवा विझताना मोठा होतो, त्याप्रमाणे राऊत सध्या फडफडत आहेत. उबाठा गटाचा हा शेवटचा दिवा आता कायमचा विझणार आहे, हे जनतेने ओळखले आहे. ममता बॅनर्जींनी गेल्या १५ वर्षांत बंगालमध्ये केवळ दादागिरी आणि गुंडगिरी केली आहे, आता जनतेने त्यांना घरी बसवून त्यांची जागा दाखवून दिली आहे. राऊत जर त्यांचे समर्थन करत असतील, तर त्यांनी प्रत्यक्ष बंगालमध्ये जाऊन आंदोलनात सहभागी व्हावे."



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *