मुंबई: पश्चिम बंगालमधील निवडणूक निकाल आणि राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना (उबाठा) गटावर बोचरी टीका केली आहे. "संजय राऊत हे आपल्या सहकाऱ्यांना गिळणाऱ्या काँग्रेस नावाच्या 'अजगर'चे पिल्लू आहेत," असा टोला लगावत त्यांनी उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंनी कोलकातामध्ये जाऊन आंदोलन करावं
ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ उभ्या ठाकलेल्या उद्धव ठाकरेंना नवनाथ बन यांनी खोचक सल्ला दिला आहे. "उद्धव ठाकरेंना मातोश्रीबाहेर पडावसं वाटत नाही, पण आता त्यांनी थेट कोलकाता गाठावे आणि ममता बॅनर्जी यांच्या घरात बसून वर्षभर आंदोलन करावे. सत्तेसाठी हपापलेल्या संजय राऊतांनी आपल्या पक्षाच्या आमदारांकडे लक्ष देण्याऐवजी दुसऱ्यांच्या राज्यात लुडबुड थांबवावी. एकनाथ शिंदे गेल्यानंतर तुम्हाला जाग येते, यातच सर्व काही समजते," अशी टीका बन यांनी केली.
काँग्रेस म्हणजे सहकाऱ्यांना गिळणारा अजगर
पश्चिम बंगालमध्ये 'इंडिया' आघाडीचे अस्तित्वच नव्हते, असा दावा करत बन म्हणाले की, "ही ध्येयधोरण नसलेली आघाडी आहे. काँग्रेस हा आपल्या सहकाऱ्यांना गिळणारा अजगर आहे. ज्या ज्या पक्षांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली, त्यांचे अस्तित्व संपवण्याचे काम काँग्रेसने केले आहे. संजय राऊत केवळ स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी काँग्रेसची सुपारी घेऊन काम करत आहेत."
जरांगेंच्या सल्लागारांनी अर्धवट माहिती देऊ नये
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विधानांवर भाष्य करताना बन म्हणाले की, "जरांगे यांच्या सल्लागारांनी त्यांना चुकीची माहिती देऊ नये. भाजपने यापूर्वीही ममता बॅनर्जींचा पराभव केला आहे. जरांगे पाटलांनी बंगालमध्ये जाऊन बॅनर्जींची दहशत पाहावी, मगच भाष्य करावे. फडणवीस हे कायद्याने चालणारे नेते आहेत. नसरापूर येथील चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फासावर चढवण्याचे काम हे सरकारच करेल, त्यामुळे या संवेदनशील विषयात कोणीही राजकारण करू नये."
उबाठाचा 'दिवा' आता विझणार
संजय राऊत यांच्या विधानाचा समाचार घेताना नवनाथ बन म्हणाले की, "दिवा विझताना मोठा होतो, त्याप्रमाणे राऊत सध्या फडफडत आहेत. उबाठा गटाचा हा शेवटचा दिवा आता कायमचा विझणार आहे, हे जनतेने ओळखले आहे. ममता बॅनर्जींनी गेल्या १५ वर्षांत बंगालमध्ये केवळ दादागिरी आणि गुंडगिरी केली आहे, आता जनतेने त्यांना घरी बसवून त्यांची जागा दाखवून दिली आहे. राऊत जर त्यांचे समर्थन करत असतील, तर त्यांनी प्रत्यक्ष बंगालमध्ये जाऊन आंदोलनात सहभागी व्हावे."
शहर
- पुणे: पासपोर्ट अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ८ जुलैला प्रादेशिक कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुणे: पासपोर्ट अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ८ जुलैला प्रादेशिक कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
गुन्हा
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- दैनिक राशिभविष्य: आज या राशींचे नशीब फळफळणार; आर्थिक प्रगती आणि नोकरीत बढतीचे योग!
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!


























Subscribe to my channel

