Pune : घोषणा करायच्या, पैसे काढायचे आणि जनतेची दिशाभूल; भाजपवर पृथ्वीराज चव्हाणांची जोरदार टीका

Pune : काँग्रेसच्या सत्ताकाळात जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेतून (जेएनएनयूआरएम) पुण्यासाठी कोट्यवधींचा निधी मिळवून दिली. त्यानंतर, भाजपच्या काळात स्मार्ट सिटीपासून ते हायपर लूपपर्यंत फक्त घोषणाच झाल्या. घोषणा करून पैसे काढायचे आणि लोकांच्या डोळ्यात धूळफेक करायची, हाच यांचा उद्योग आहे’, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर गुरुवारी तोफ डागली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासाठी ८० हजार कोटी रुपयांच्या योजनांची घोषणा केली होती. त्याचा चव्हाण यांनी समाचार घेतला. ‘घोषणा करायला पैसे लागत नाहीत. याच नेत्यांनी स्मार्ट सिटी, हायपर लूपची घोषणा केली. त्याचे पुढे काय झाले? केवळ घोषणा करायच्या आणि त्यातून पैसै काढायचे व लोकांच्या डोळ्यात धूळफेक करायची, असे उद्योग सुरू आहेत’, असे ते म्हणाले.

Pune : मोठी बातमी रेल्वे प्रवाशांना फटका; पुणे–नागपूर मार्गावरील काही गाड्या २२ दिवस रद्द, पर्यायी व्यवस्था काय?

राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप एकच असून ते पुणेकरांना फसवत आहेत. त्यांनी जागा जिंकण्याच्या भाषेपेक्षा त्या वाटून घ्याव्यात. पुणेकरांनी पूर्वी काँग्रेसच्या सत्ताकाळात झालेला विकास पाहिला आहे. भाजपचा गैरकारभारही पाहिला आहे. त्यामुळे जनतेने पाच वर्ष काँग्रेसला संधी द्यावी, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले. विलासराव देशमुख यांच्यावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली टीका म्हणजे वैचारिक दिवाळखोरी आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेसच्या पुण्यासाठीच्या जाहीरनाम्याच्या प्रकाशनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. या वेळी माजी मंत्री बंटी पाटील उपस्थित होते.

तीन पक्षांच्या महायुती सरकारकडून पुण्याचे लचके तोडले जात आहेत. हे सरकार केवळ भ्रष्टाचारात गुंतले आहे. कोणाला किती वाटा मिळणार याकडेच त्यांचे लक्ष आहे. - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “Pune : घोषणा करायच्या, पैसे काढायचे आणि जनतेची दिशाभूल; भाजपवर पृथ्वीराज चव्हाणांची जोरदार टीका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *