BMC Election : शिंदेंचे दोन ‘धुरंधर’ भाजपसाठी अडथळा ठरले; जागावाटपात अडून बसत 52 ऐवजी तब्बल 90 जागा मिळवल्या

Mumbai : राज्यभरातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करण्याची लगबग सुरु झाली होती. ती आज संपली. बऱ्याच ठिकाणी बंडखोरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामुळे प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. मुंबईत शिंदेसेना-भाजप विरुद्ध ठाकरे बंधू असा थेट सामना होणार आहे. ठाकरे बंधूंची युती झाल्याचा फायदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवला आणि भाजप सोबतच्या चर्चेतून ९० जागा मिळवल्या. यात दोन नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

मुंबई महापालिका निवडणूक युती म्हणूनच लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीपासूनच सांगितलं होतं. पण जागावाटपाच्या पहिल्या फेरीत भाजपनं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा प्रस्ताव दिला. शिंदेसेना १२५ जागांसाठी आग्रही असताना त्याच्या निम्म्या जागाही भाजपनं देऊ केल्या नाहीत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे ८४ उमेदवार निवडून आले होते. पण तरीही भाजपनं ५२ जागांचा प्रस्ताव दिला.

Solapur : अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सोलापुरात मोठा गोंधळ; भाजप नेत्यांना विरोधकांनी निवडणूक कार्यालयाच्या गेटवरच रोखलं, नेमकं काय घडलं?

शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या ४० हून अधिक नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदे गटाची वाट धरली. अन्य पक्षातील २१ माजी नगरसेवकदेखील शिंदे यांनी गळाला लावले. त्यामुळे शिंदे यांच्याकडे ६० प्रभागांमधील माजी नगरसेवक होते. शिवसेनेनं गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या ८४ जागांसाठी शिंदे प्रचंड आग्रही होते. अखेर ५२ वरुन सुरु झालेली चर्चा ९० वर जाऊन थांबली. जागावाटपात शिंदेसेनेनं मोठी मजल मारली.

जागावाटपाच्या चर्चेत पहिल्याच फेरीत भाजपनं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा प्रस्ताव दिला. शिंदेसेनेला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रस्ताव भाजपनं करुन पाहिला. पण शिंदे यांनी त्यांचे दोन मातब्बर नेते चर्चेसाठी पाठवले आणि हळूहळू चित्र बदलले. मंत्री उदय सामंत आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी चर्चेत शिंदेसेनेची भूमिका अगदी ठासून मांडली. राहुल शेवाळे दोन टर्मचे खासदार आहेत. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रदिर्घ काळ काम केलं आहे. त्यामुळे शहराची, पालिका प्रभागांची त्यांना चांगली जाण आहे. याचा फायदा शिंदेसेनेला झाला. उदय सामंत आणि राहुल शेवाळे वाटाघाटीत कमी पडले नाहीत. त्यामुळेच ५२ जागांवरुन सुरु झालेली चर्चा ९० च्या घरात पोहोचली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *